शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:04 IST

तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते

कोयनानगर : कोयना धरणातूनपाणी मिळावे, अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, कोयना धरणात केवळ १८ टीएमसी पाणीसाठा असल्याने कोयनेतून कर्नाटकला पाणी देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते.सध्या कोयनेतून ३,१४० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सांगली जिल्ह्याच्या मागणीनुसार सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. मात्र, अतिरिक्त पाणी सोडावे लागल्यास आणि पाऊसकाळ लांबला तर पाण्याची टंचाई जाणवणार आहे.महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सन २०२३-२४ च्या तांत्रिक वर्षास १ जूनपासून सुरुवात झाली. ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातून ३३६१.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.कोयना धरणाचे पाणीवाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षानुसार होत असते. कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. यामधील ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मिती व उर्वरित सिंचनासाठी वापरले जाते. चालू वर्षी ६७.५० टीएमसी पाणी या लवादाच्या आरक्षित पाणीसाठ्याची मर्यादा ओलांडत तब्बल ७१.०९ टीएमसी पाण्याचा वापर पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी करण्यात आला.सध्या १८.०९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, मृतसाठा ५.१२ टीएमसी वगळता १२.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी निव्वळ पाणीसाठा १६.२० टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षांची तुलना केली असता पाणीसाठा कमी आहे. मात्र, सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी