शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Satara: कोयनेचे दरवाजे आठ फुटांवर; कण्हेर, उरमोडीतून पाण्याचा विसर्ग बंद  

By नितीन काळेल | Updated: August 5, 2024 18:43 IST

महाबळेश्वरला १२० मिलिमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाश्यावर पाऊस कमी झाला आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकवर परिणाम झाल्याने कण्हेर आणि उरमोडीच्या दरवाजातील विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला आहे. तर कोयना धरणाच्या दरवाजातील विसर्ग ५० हजारांवरुन ४० हजारांपर्यंत कमी झाला असून दरवाजे आठ फुटांवर आहेत. यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होणार आहे. तर २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्यात मागील तीन आठवड्यापासून दररोज पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे पश्चिमेकडील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला. धरणे लवकरच ८० टक्क्यांवर गेली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. त्यातच रविवारपासून पश्चिमेकडील घाटमाथा परिसरात पावसाची उघडझाप सुरू झाली आहे. यामुळे धरणांतही पाण्याची आवक सावकाश आहे. यासाठी धरण व्यवस्थापनांनी धरणातील विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९३ तर नवजाला ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४ हजार १२१, नवजा येथे ४ हजार ७७३ तर महाबळेश्वरमध्ये ४ हजार ५७१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरी प्रमाण कमी आहे.धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. सकाळच्या सुमारास ४५ हजार ६११ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास सहा दरावाजातून ४० हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक वेगाने पाणी सुरूच आहे. त्यामुळे धरणातून एेकूण ४२ हजार १०० क्यूसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे.

धोममधून विसर्ग कमी..वाई तालुक्यात धोम धरण आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला असल्याने आवकवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास दरवाजा आणि विद्युतगहातून होणारा विसर्ग ६ हजारवरुन एक हजार ६० क्यूसेक करण्यात आलेला आहे. तरीही पावसाचे प्रमाण पाहून आवक कमी किंवा अधिक करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

कण्हेरमधून ३८० क्यूसेक..सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग करण्यात येत होता. पण, सध्या पाऊस कमी झाल्याने सांडव्यातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारस विद्युतगृहातूनच ३८० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते.

उरमोडीतून ४५० क्यूसेक विसर्ग..उरमोडी धरणाच्या सांडव्यातीलही विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या विद्युतगृहातून ४५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. पाण्याची आवक पाहून विसर्गाबाबत निर्णय घेतला जाईल, असे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणWaterपाणी