शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कोल्हापुरी बंधाऱ्यात होणार ठणठणाट !

By admin | Updated: December 1, 2014 00:21 IST

शेतकरी चिंताग्रस्त : मराठवाडीत व्हॉल्व्हला गळती लागल्याचा परिणाम

कुसूर : वांग नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अडवून पाणीसाठा करण्याचे काम सुरू आहे़ पाणी अडविलेले काही बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत़ मात्र टंचाई काळात या बंधाऱ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या वांग-मराठवाडी धरणाच्या व्हॉल्व्हला गळती असल्यामुळे टंचाई काळात धरणात पाणीसाठा शिल्लक राहील का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे़ व्हॉल्व्हची गळती काढण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यातून होत आहे़ उशिरापर्यंत लांबलेला पावसाळा संपलेला असून, नदी ओढ्यांचा प्रवाह कमी होऊ लागला आहे़ रब्बी पिकांसाठी वांग नदीवरील आणे, अंबवडे, काढणे, मालदन येथील कोल्हापुरी बंधारे अडविण्याचे काम सुरू झाले आहे़ आणे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे़ रब्बी हंगामातील पिके भरत असताना बंधाऱ्यात पाणीटंचाई होते़ यावेळी मराठवाडी धरणातून पाणी सोडून बंधारे भरतात़ त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही शेतीला, जनावरांना वापरासाठी भरपूर पणी उपलब्ध होत असतो़ मालदन, साईकडे, काढणे, अंबवडे आणि आणे येथील बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठी होतो़ तर खळे आणि येणपे येथील बंधारे गत दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत, ते पूर्ण करून त्यामध्ये पाणीसाठा करावा, अशी मागणी संबंधित गावातील शेतकरी सातत्याने करत आहेत़ मात्र, शासनाकडून कसलीही हालचाल होताना दिसून येत नाही़ ऐन पावसाळ्यात धरणात पाणीसाठा करणे अपेक्षित असतानाही तो केला नाही़ पावसाळा सरता धरणातून नदीत येणारे पाणी बंद करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते़ त्याप्रमाणे पावसाळा संपता धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व्ह बंद केला़ मात्र व्हॉल्व्ह नादुरूस्त अवस्थेत होता़ त्याची कसलीही दुरूस्ती न केल्याने सध्या यामधून पाण्याची गळती होत आहे़ (वार्ताहर)कारखानदारांवर फौजदारी करावांग नदीवरील अनेक गावांना नदीशेजारील विहिरीमधून पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो़ बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत नाही़ मात्र, वांग-मराठवाडी धरणातील पाणीसाठा गळतीमुळे झपाट्याने कमी होत असलेल्या पाण्यामुळे पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे़