विभागात ‘कोल्हापूर’ अव्वल

By Admin | Updated: June 3, 2014 01:24 IST2014-06-03T01:14:19+5:302014-06-03T01:24:37+5:30

सातारा द्वितीय सलग तिसर्‍या वर्षी मुलींची सरशी

Kolhapur tops in division | विभागात ‘कोल्हापूर’ अव्वल

विभागात ‘कोल्हापूर’ अव्वल

 कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणार्‍या बारावीचा निकाल आज, सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा यावर्षीचा निकाल ९१.५४ टक्के लागला. यात ९२.२० टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला. सातारा जिल्ह्याने ९१.२६ टक्क्यांसह दुसरा क्रमांक मिळविला, तर गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेल्या सांगली जिल्ह्याची घसरण होऊन तो ९०.९१ टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के होता. त्या तुलनेत यंदा ७.४० टक्क्यांनी निकाल वाढला आहे. आज दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष भीमराव कांबळे आणि सचिव शरद गोसावी यांनी येथे पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. कोल्हापूर विभागातून ५८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १४ हजार ६०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी एकूण ६३ हजार ८३५ मुले, तर ५० हजार ७६८ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५६ हजार ५० असून, त्यांचे प्रमाण ८७.८० टक्के इतके आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४८ हजार ८५६ असून, त्यांचे प्रमाण ९६.२३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ८.४३ टक्के इतके अधिक आहे. सलग तिसर्‍या वर्षी मुलींची उत्तीर्णतेच्या प्रमाणात सरशी राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून २२० कनिष्ठ महाविद्यालयांतून ४६ हजार २५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कºहाडची आकांक्षा, सातारची मृगजा ‘टॉप’वर सातारा : फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा आॅनलाइन निकाल आज, सोमवारी जाहीर झाला. यामध्ये कºहाडच्या सद्गुरू महाराज विद्यालयातील आकांक्षा संजय नलवडे हिने ९७.८ टक्के गुण, तर सातारच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या मृगजा जालिंदर यादव हिने ९७.७ टक्के गुण मिळवत ‘टॉप’वर राहण्याचा मान मिळविला. विज्ञान शाखेसाठी १३ हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेसाठी १२ हजार ४१० विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर वाणिज्य शाखेसाठी बसलेल्या ७ हजार ९०५ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय शिक्षण शाखेतील १ हजार ६५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ३४.२४% जुन्या अभ्यासक्रमासाठी एकूण ३ हजार ४२२ विद्या ३ हजार २५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ हजार ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचा निकाल ३४.२४ टक्के लागला.

Web Title: Kolhapur tops in division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.