शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

खटाव तालुक्यात महापूर... मायणी तलाव मात्र ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 14:58 IST

खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपावसाची पाठ : पिके धोक्यातपाणीटंचाईचे संकट भेडसावण्याची चिन्हेबळीराजाचे आभाळाकडे लक्ष

मायणी , दि. १७ :  खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात तसेच खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागांत दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील येरळा, येळीवसह इतर लहान-मोठ्या तलावक्षेत्रांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या भागातील सर्व पाझर तलाव, नालाबांध, मातीबांध, जलसंधारणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

मायणी परिसरात अद्याप पाऊस न झाल्याने कलेढोण, विखळे, गारुडी, गारळेवाडी, तरसवाडी व पाचवड या गावांमधील पाझर तलाव, विहिरी, नालाबांध, तसेच पाणी फाउंडेशन व जलसंधारणातून झालेल्या बंधाºयांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. यामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट जाणून लागले आहे. येत्या काही दिवसांत जर पाऊस झाला नाही, तर या भागातील नागरिकांना जानेवारी, फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.बळीराजाचे आभाळाकडे लक्षपाऊस नसल्याचे मायणी व कानकात्रे येथील दोन्ही ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे आहेत. हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले तर या भागातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असते. याच तलावांवर येथील खरीप व रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण