शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खटाव तालुक्यात महापूर... मायणी तलाव मात्र ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 14:58 IST

खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपावसाची पाठ : पिके धोक्यातपाणीटंचाईचे संकट भेडसावण्याची चिन्हेबळीराजाचे आभाळाकडे लक्ष

मायणी , दि. १७ :  खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात तसेच खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागांत दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील येरळा, येळीवसह इतर लहान-मोठ्या तलावक्षेत्रांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या भागातील सर्व पाझर तलाव, नालाबांध, मातीबांध, जलसंधारणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

मायणी परिसरात अद्याप पाऊस न झाल्याने कलेढोण, विखळे, गारुडी, गारळेवाडी, तरसवाडी व पाचवड या गावांमधील पाझर तलाव, विहिरी, नालाबांध, तसेच पाणी फाउंडेशन व जलसंधारणातून झालेल्या बंधाºयांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. यामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट जाणून लागले आहे. येत्या काही दिवसांत जर पाऊस झाला नाही, तर या भागातील नागरिकांना जानेवारी, फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.बळीराजाचे आभाळाकडे लक्षपाऊस नसल्याचे मायणी व कानकात्रे येथील दोन्ही ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे आहेत. हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले तर या भागातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असते. याच तलावांवर येथील खरीप व रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण