शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

खटाव तालुक्यातील तलाव कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 1:08 PM

वडूज : जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसाने धरणे भरत आली आहेत. मात्र, नेमकी विरुध्द परिस्थिती पूर्व भागात आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने ओढे-नाले आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. पाऊस नसल्याने बटाटा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल

वडूज : जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या दमदार पावसाने धरणे भरत आली आहेत. मात्र, नेमकी विरुध्द परिस्थिती पूर्व भागात आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने ओढे-नाले आणि तलाव अद्याप कोरडेच आहेत. पाऊस नसल्याने बटाटा लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

जून महिन्यात झालेल्या पावसावर शेतकºयांनी पेरणीची कामे उरकली. घेवडा, ज्वारी, बाजरी, वाटाणा, सोयाबीन आदी पिके शेतकºयांनी शेतात घेतली आहेत. जुलै महिन्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे विहीर, ओढे-नाले, तलाव यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. आॅगस्ट महिना सुरू झाला तररी पाण्याचे स्त्रोत कोरडे ठणठणीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रिमझिम पावसावर पिकांची वाढ चांगली झाली असली तरी सध्या मोठ्या पावसाची गरज आहे.

अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी तलाव, विहिरी कोरड्या असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची  शक्यता आहे. येरळवाडी, नेर शिरसवडी, पारगाव, येळीव पाझर तलाव अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पूर्वेकडील भागात पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र पाऊस समाधानकारक झाला आहे. उरमोडी, कण्हेर, धोम, तारळी धरणातील पाणी पाततळीत वाढ झाली आहे.

कृष्णा नदीच्या पात्रात पाणी वाढले होते. हे पाणी वाहून कर्र्नाटकच्या आलमट्टी धरणात जात आहे. शासनाने वाया जाणारे पाणी अडवून दुष्काळी भागातील तलाव भरून घेण्यात यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे.बटाट्याचे क्षेत्र घटले

खटाव तालुक्यातील प्रामुख्याने औंध, पुसेगाव, पुसेसावळी या पश्चिम पट्ट्यात बटाट्याचे नगदी पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु, पुरेसा पाऊस न झाल्याने आणि विहिरीत पाणी नसल्याने शेतकºयांनी बटाटा पिकाकडे पाठ फिरविल्याने यंदा बटाट्याचे क्षेत्र घटले आहे.