शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षांबाबत सस्पेन्स, २६ जूनला होणार मतदान; कोण होणार लोकसभेचा स्पीकर
2
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
3
“२५० जागांवर तयारीचे राज ठाकरेंचे आदेश, स्वबळावर विधानसभा निवडणूक...”: बाळा नांदगावकर
4
ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”
5
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
6
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
7
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
8
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
9
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
10
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
11
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
12
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
13
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
14
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
15
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
16
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
17
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
18
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
19
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 
20
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...

खराडे गावाने कोरोनाला वेशीबाहेरच रोखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:40 AM

मसूर : मसूर व हेळगांव भागातील अनेक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असला तरी याला खराडे ता. कराड हे गाव ...

मसूर : मसूर व हेळगांव भागातील अनेक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असला तरी याला खराडे ता. कराड हे गाव अपवाद ठरले आहे. या गावामध्ये आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. आपला गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी गावातील हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवत संपूर्ण गाव एकवटला आहे.

कोरोना संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी ग्रामपंचायत, कोरोना समिती व संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेतली व त्यामध्ये करावयाच्या उपाययोजनासंबंधी चर्चा झाली. सर्वानुमते गावच्या सीमा सील करण्याचा ठराव झाला. त्यानुसार गावामध्ये येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. गावामध्ये येणाऱ्यांची कसून चौकशी करूनच त्याला सोडले जात आहे. या गावातून हेळगांव, पाडळी, मसूर या ठिकाणाहून येणारे प्रवासी जवळचा रस्ता म्हणून पेरले पुलाचा आधार घेत राष्ट्रीय महामार्गावर जात आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरून वाठार, पाडळी, मसूरकडे जाण्यासाठी याच गावातून जायला रस्ता आहे. त्यामुळे या सर्व लोकांची योग्य ती चौकशी करूनच त्यांना गावामध्ये प्रवेश दिला जात आहे.

नाकाबंदी केली आहे तेथे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. गावाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी सर्वांची धडपड सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. सुमारे दोन हजार लोकवस्तीच्या या गावात अनेकांचे पाहुणे आहेत; परंतु या कालावधीत पाहुण्यांना येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तर गावातील लोकांनी कारणाशिवाय गावाबाहेर पडायचे नाही, असा निर्णय घेण्यात आल्याने गावातील लोक आपल्या घरात सुरक्षित आहेत. गाव कृष्णा नदीकाठी वसलेले असल्याने गावचा शिवार संपूर्ण बागायत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी सवलत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये काम करावे अन्यथा दिवसभर झाडाच्या सावलीचा आधार घेत शेतातच थांबावे, असा निर्णय झाल्याने शेतीची कामेही झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी सरपंच सुनीता संजय कदम, उपसरपंच विक्रम गुरव, सदस्य मोहन बर्गे, संतोष जाधव, अधिक कांबळे, उमाजी मदने, संदीप जाधव, बाळू जाधव, सचिन जाधव, ग्रामसेवक रमेश माळी यांसह गावकामगार, तलाठी, कृषी अधिकारी रणपीसे, शिक्षकवर्ग, आरोग्य विभाग, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व युवकांचा आरेाग्यपूर्ण लढा सुरू आहे.

(कोट)

संपूर्ण गाव एकवटले

खराडे गावामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक रुग्ण आढळून आले होते. गावाने कोरोना काळात काय यातना सहन कराव्या लागतात याचा अनुभव घेतला आहे. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये गाव अजूनही कोरोना रुग्णांपासून दूर राहिले आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढ्याला संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.