शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

धैर्यशिलांचे ‘कदम’ काँगे्रसपासून दूर ! : कारण-राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:02 IST

मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; पण गत 5 वर्षांत मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी येथे बरीच मशागत केली आहे, त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार निश्चित.

ठळक मुद्देपक्षाकडे उमेदवारीची मागणीच नाही; सर्वच पक्षांची तयारी सुरू

प्रमोद सुकरे ।क-हाड : विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वेगाने वाहू लागले आहेत. कºहाड उत्तरही त्याला अपवाद नाही. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. मात्र, गतवेळी काँग्रेसमधून लढलेल्या धैर्यशिलांचे ‘कदम’ सध्या पक्षापासून दूर दिसताहेत. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारीच मागितलेली नाही. त्यामुळे कदमांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

क-हाड उत्तरमधील गत विधानसभेची निवडणूक ही तिरंगी झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांकडून धैर्यशील कदम पराभूत झाले असले तरी त्यांना दोन नंबरची मते मिळाली होती. तर त्यावेळचे स्वाभिमानीचे उमेदवार मनोज घोरपडे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर पराभवाने खचून न जाता धैर्यशील कदमांनी पुढच्या लढाईची तयारी सुरू केली.वर्धन अ‍ॅग्रोची उभारणी करत मतदार संघात कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत केले आहे. त्यामुळे उत्तरच्या मैदानात ते शड्डू ठोकणार हे नक्की ? पण त्यांनी पक्षाकडे उमेदवारीच न मागितल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला  जातो; पण गत पाच वर्षांत मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी येथे बरीच मशागत केली आहे, त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार निश्चित आहे. आता ही निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार? कोण-कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणार? यावर बºयाच गोष्टी अवलंबून आहेत.

सध्या जिल्ह्यात काँग्रेसची वाट अवघड बनली आहे. कºहाड दक्षिण व माण मतदारसंघ वगळता पक्षाचा कुठेही आमदार नाही. अशा परिस्थितीत कºहाड उत्तरमधून गतवेळी दोन नंबरवर असणाºया कदमांनी उमेदवारीच मागितलेली नाही, याची चर्चा तर होणारच ! तसेच या मतदार संघातून जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव पाटील आणि अजित पाटील-चिखलीकर यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा प्रभाव जादा आहे. सध्या दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे वारे सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात नेमक्या काय वाटाघाटी होणार, यावरच इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे.शिवसेना प्रवेशाच्या चर्चा...काँग्रेसमधून उमेदवारीच मिळणार नसल्याने धैर्यशील कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. भाजप-शिवसेना युतीत उत्तर विधानसभा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आहे. कदम ऐनवेळी सेनेत प्रवेश करतील व धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

पृथ्वीराज का उदयसिंहांना काँग्रेसचा ‘हात’...कºहाड दक्षिण मतदार संघातून काँग्रेसकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. दक्षिणेतून लढण्यासाठी दोघांचीही तयारी आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी पृथ्वीराज की उदयसिंहांना काँग्रेसचा हात देणार, याची चर्चा आहे. सध्यातरी उदयसिंह यांनी काँग्रेसला पहिली पसंती दिलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना विराम मिळाला आहे. आता हा पूर्ण आहे की अल्पविराम, हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षाच करावी लागेल.

पाटण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडे हिंदुराव पाटील व नरेश देसाई या दोघांनी उमेदवारी मागितली आहे. येथे सध्या शिवसेनेचे शंभूराज देसाई आमदार आहेत. तर आघाडीत मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे आघाडीतील नेत्यांची चर्चा व भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीला आघाडी होती. तशीच विधानसभेलाही राहणार आहे. मग कºहाड उत्तर मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला जातो. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागून काय करायचे ? उमेदवारी मागूनही मिळणार नसेल तर कशाला मागायची? अशा भावनेतूनच मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली नाही.- धैर्यशील कदम, चेअरमन, वर्धन अ‍ॅग्रो. लि.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण