गुळुंबच्या ‘त्या’ अभागिनींना राष्ट्रपतींच्या निर्णयाने न्याय
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:27:52+5:302015-11-04T00:08:27+5:30
न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर सर्व साक्षीदार ठाम राहिले. तपासी अधिकाऱ्यांनी जोरदार बाजू मांडली.

गुळुंबच्या ‘त्या’ अभागिनींना राष्ट्रपतींच्या निर्णयाने न्याय
भुर्इंज : गुळुंब ता. वाई येथील दोन बालिकांवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मोहन चव्हाण याच्या फाशीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर गुळुंब गावात समाधान व्यक्त होत आहे. ‘मोहन चव्हाणला यापूर्वीच फाशी व्हायला हवी होती,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मोहन चव्हाण याचा गुळुंब गावाशी कसलाही संबंध नाही. तो नेमका कुठला याबाबतही वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. ज्यावेळी या दोन मुली गायब झाल्या. त्यावेळी भुर्इंज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास लोक गेले होते. मात्र, संबंधित पोलीस ठाणे अंमलदाराने तक्रारदारांना हाकलून लावले होते. आणि दुसऱ्याच दिवशी त्या मुलींचे मृतदेह सापडले. याप्रकरणी संबंधित ठाणे अंमलदारावर बडतर्फीची कारवाईही झाली होती. न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर सर्व साक्षीदार ठाम राहिले. तपासी अधिकाऱ्यांनी जोरदार बाजू मांडली. त्यामुळेच अवघ्या काही दिवसात मोहन चव्हाणला फाशी झाली. त्या फाशीवर शिक्कामोर्तब झाल्याने संपूर्ण गुळूंबमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)