शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

कोरोनाकाळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:26 AM

सातारा : जिल्हा परिषदेत कार्यरत असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना वारसांच्या नोकरी मिळणार आहे. या काळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ...

सातारा : जिल्हा परिषदेत कार्यरत असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना वारसांच्या नोकरी मिळणार आहे. या काळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतील वारसदाराने सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यानंतर अनुकंपा तत्त्वातून वारसदारांना नोकरी मिळणार आहे.

कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होते. आतापर्यंत जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील २४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. यामधील, ५ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा विमा मिळाला असून, उर्वरित प्रस्ताव राज्यशासनास पाठविले आहेत. तसेच, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी राज्य शासनाने योजना लागू केली आहे. यामध्ये कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांनी अनुकंपावरील नियुक्तीच्या योजनेची माहिती, पात्र नातेवाईक, अर्ज करण्याची मुदत, शैक्षणिक आर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

दरम्यान, कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे पात्र वारसदार सज्ञान नसल्यास अर्ज करता येणार नाही. ते वारसदार सज्ञान झाल्यानंतर एका वर्षाच्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे. यामध्येही कुटुंब निवृत्तीवेतन धारकाला वेतन विषयक कागदपत्रांची पूर्तता करताना लेखी कळविणे संबंधित आस्थापना अधिकाºयाला बंधनकारक आहे. जोपर्यंत अनुकंपा नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे उमेदवारांकडून प्राप्त होत नाहीत. तोपर्यंत वारसदारांचे नाव समाविष्ट करता येत नसल्याचे. स्पष्ट करण्यात आले आहे.

...............

कोट :

कोरोनाकाळात जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा विमा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना अनुकंपा अंतर्गत नोकरी मिळविण्यासाठी वारस सज्ञान झाल्यानंतर अर्ज करणे बांधनकारक आहे. याबाबतचे अर्ज घेण्याबाबत सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना कळविण्यात आलेले आहे.

- मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

......................................................................