शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राज्यात वसतिगृहांची अनुदाने मिळत नाहीत ही शोकांतिका - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:26 IST

फुले, आंबेडकर साहित्य पंचायतीचे पुरस्कार प्रदान

सातारा : सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत राज्यकर्त्यांकडे आस्था नाही. राज्यात गोरगरिबांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिक्षण संस्था व वसतिगृहांची अनुदाने मिळत नाहीत ही पुरोगामी महाराष्ट्रातील शोकांतिका असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.भारतीय भटके व विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने पुढे आंबेडकर साहित्य पंचायतीच्या वतीने देण्यात येणारा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, भाई शैलेंद्र माने, यशवंत माने, प्रा. जीवन बोराटे, डॉ. समता जीवन, मच्छिंद्रनाथ जाधव, शशी माने, हरिदास जाधव, नारायण जावलीकर, सुलोचना माने, कादंबरी माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘मागील काही दिवसांमध्ये अनुदान थकीत ठेवण्याची मानसिकता राज्यकर्त्यांची वाढली आहे. एकीकडे मोफत योजनांचे गाजर दाखवून मतांचे राजकारण करताना दुसरीकडे गोरगरीब आणि सामान्य यांच्यावर अन्याय होत आहे. राज्यातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण संस्था, वसतिगृहांची अनुदाने मिळत नसल्यामुळे संस्थाचालकांची अडचण होत आहे.’दरम्यान, भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने फुले आंबेडकर साहित्य पंचायतीच्या वतीने देण्यात येणारा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. नागोराव कुंभार, साहित्यिक रामराजे तथा रावणराजे आत्राम यांना संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार तर लेखक विलासराव माने यांना युवा साहित्य पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीनिवास पाटील यांच्यासह रामराजे आत्राम, विलासराव माने, प्रा. डॉ. नागोराव कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारGovernmentसरकार