शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयनेचे एक युनिट बंद

By नितीन काळेल | Updated: December 2, 2023 12:03 IST

सांगलीसाठी तीनवेळा पाणी सोडले..

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या १,०५० क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू आहे. तर धरणात सध्या सुमारे ८४ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर पिण्याच्या पाणी योजना अवंलबून आहेत. तसेच सिंचनाच्या तीन मोठ्या योजनांनाही पाणी पुरविले जाते. तर वीजनिर्मितीसाठीही पाण्याचा कोटा राखीव असतो. मात्र, यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रातच पर्जन्यमान कमी होते. त्यामुळे धरण भरलेच नाही. तर ९४ टीएमसीवरच धरणातील पाणीसाठा गेला होता. त्याचबरोबर परतीच्या पावसानेही दगा दिलेला. त्यामुळे धरण भरले नसल्याने यंदा कोयनेतील पाणी तापू लागले आहे. त्यातच दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन पाणीसाठा राखीव ठेवण्याची सूचना असताना सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे धरणातून पाणी विसर्ग करावा लागत आहे.मागील आठवड्यात सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मागील शनिवारपासून धरणाच्या पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला एक युनीट सुरू करुन १,०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. त्यानंतर सिंचनासाठी आणखी मागणी वाढली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पायथा वीजगृहाचे दुसरे युनीटही सुरू केले. त्यामुळे सांगलीतील सिंचनासाठी एकूण २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

त्यातच सांगलीतील सिंचनासाठी एकूण दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. सध्या सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून एक युनीट बंद करण्यात आले आहे. परिणामी एका युनीटमधूनच १,०५० क्यूसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे.

सांगलीसाठी तीनवेळा पाणी सोडले..कोयना प्रकल्पांतर्गत बहुतांशी सिंचन क्षेत्र हे सांगली जिल्ह्यातच आहे. त्यामुळे सांगलीच्या पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पाणी सोडले जाते. तर धरणातील पाण्यावर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या पाणी योजना अवलंबून आहेत. पावसाळ्यापासून सांगलीतील सिंचनासाठी कोयनेतून तीनवेळा पाणी सोडण्यात आलेले आहे. तर यंदा धरण भरले नसल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात कपात करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी