शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला निमंत्रण : वाईच्या बाजारात मरणाची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 19:32 IST

CoroanVirus Satara : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात प्रशासनाने सकाळी सात ते अकरा ही भाजीपाला व इतर घरगुती वस्तू खरेदीसाठीची वेळ ठरवून दिलेली आहे, गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने मुख्य भाजी मंडई बंद करून प्रत्येक प्रभागात भाजी विक्रीस परवानगी दिली आहे. या वेळेत शहरातील व ग्रामीण भागातील लोक जीवनावश्यक वस्तू, भाजी व इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतानाचे चित्र वाई शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देकोरोनाला निमंत्रण : वाईच्या बाजारात मरणाची गर्दी! जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकं उतरतायत रस्त्यावर!

वाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यात प्रशासनाने सकाळी सात ते अकरा ही भाजीपाला व इतर घरगुती वस्तू खरेदीसाठीची वेळ ठरवून दिलेली आहे, गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने मुख्य भाजी मंडई बंद करून प्रत्येक प्रभागात भाजी विक्रीस परवानगी दिली आहे. या वेळेत शहरातील व ग्रामीण भागातील लोक जीवनावश्यक वस्तू, भाजी व इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतानाचे चित्र वाई शहरासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.लोक कोरोना आजाराचे गांभीर्य विसरल्यासारखे रस्त्यावर येतायत, खरेदीसाठी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी धावताना दिसत आहेत. पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून वेळ वाढवावी, अन्यथा घरपोच सेवा द्यावी. वेळ कमी असल्याने लोक रस्त्यावर उतरून कोरोनाला निमंत्रण देत आहेत.

प्रशासनाला कोरोना साखळी तोडायची आहे, की तशीच कायम चालू ठेवायची आहे, हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात न येणारी गोष्ट आहे, अकरानंतर रस्त्यावर प्रचंड शांतता असते; परंतु आधी दोन तास झालेली गर्दी कोरोनाला टाळू शकत नाही, कोरोना वेळ सांगून समाजात फिरत नाही, हे प्रशासनाने लक्षात घेण्याची बाब आहे.

नियम तयार करताना कोणते निकष वापरण्यात येतात, हे समजण्यापलीकडचे आहे. सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांनी गर्दी केल्यास प्रशासनाने व पोलिसांनी त्यांना तत्काळ अटकाव करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत बाजार बंद करायला हवा, बँका, मेडिकल्स, किराणा मालाची दुकाने, पेट्रोल पंप, दुकानांमधून गर्दी सुरू आहे.अनेक बँकांमध्ये गर्दी...बँका सुरू असल्या तरी व्यवहारांच्या नावाखाली बँकांना गर्दीवर अंकुश ठेवता आला नाही. सरकारी बँकेत गर्दी होत आहे. परंतु खासगी बँकांची वेळ कमी केली आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी माल घेऊन आल्याने गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी भाजी खरेदीच्या बहाण्याने झुंबड उठविली होती. प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही.मुंबई-पुण्याहून आलेल्यांची यादी करणे गरजेचे..कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासन गोंधळून गेले आहे. ग्रामीण भागातील नागरिक उन्हाळ्याची सुटी लागल्यासारखे वावरताना दिसत आहेत. पोलीस पाटलाने मुंबई-पुण्याहून आलेल्यांची फक्त यादी तयार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात लोकांना हटकल्यास वाद होताना दिसत आहेत. शहरातून येणाऱ्या लोकांवर कसलेही बंधन नाही आणि तेच कोरोना वाढीस निमंत्रण देत आहे. कोरोना साखळी तोडायची झाल्यास नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारSatara areaसातारा परिसर