शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

सातारकरांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:19 PM

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारकरांच्या जिव्हाळ्याचे तीन प्रकल्प प्रगतिपथावर असून, या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कास ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारकरांच्या जिव्हाळ्याचे तीन प्रकल्प प्रगतिपथावर असून, या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कास धरणाचे काम जवळपास ७५ टक्के तर ग्रेड सेपरेटरेचे काम ७० टक्के पूर्णत्वास आले आहे. केवळ पालिकेची भुयारी गटार योजना संथ गतीने सुरू असून, हे काम गतिमान करणे गरजेचे बनले आहे.आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाका परिसरातून दररोज सुमारे २ लाख ७१ हजार ४५० वाहने ये-जा करतात. शहरातील सर्वाधिक वाहतुकीचा ताण याच ठिकाणी पाहावयास मिळतो. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर (भुयारी मार्ग) उभारण्याचे काम बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.याचबरोबरच वाढती लोकसंख्या व शहरीकरणाचा विचार करता नगरपालिकेच्या वतीने कास धरणाची उंची वाढविण्याचे कामही हाती घेण्यात आले. १ मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत धरणाचे एकूण काम ७५ टक्के तर मातीकाम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामेही प्रगतीपथावर आहते.ग्रेड सेपरेटर व कास धरणाच्या उंचीसह शहरात यावर्षी भुयारी गटार योजनेचे कामही सातारा नगर पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या योजनेचे गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये केवळ १५ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. पावसाळ्यात कास धरण व भुयारी गटार योजनेचे काम पूर्णपणे बंद राहणारआहे. पावसाळा संपल्यानंतर ही कामे पुन्हा हाती घेतली जाणार आहेत. ग्रेड सेपरेटरचे काम मात्र पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. डिसेंबर २०१९पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनोदय आहे.७५ कोटींची योजनापुणे-मुंबईच्या धरतीवर ग्रेड सेपरेटरची बांधणी होत असून, जिल्ह्यातील ही पहिलीच योजना आहे. सुमारे ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाºया मार्गाचे अधिक काम करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले आहे. चौदा महिन्यांत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.पहिल्या टप्प्यात५० कोटींची तरतूदशहरातील चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, करंजे, बुधवार नाका परिसर, बोकील बोळ आदी ठिकाणी भुयारी गटारचे काम करण्यात आले आहे. शहरात एकूण ३२ किलोमीटर क्षेत्रात भुयारी गटारचे काम केले जाणार आहे. आतापर्यंत दोन किलोमीटर क्षेत्रातील काम पूर्ण झाले आहे. शासनाकडून या योजनेच्या पूर्णत्वासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे.