कृषीसंगमच्या उत्पादनांची अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:04+5:302021-02-27T04:51:04+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या शेत माल संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी ...

कृषीसंगमच्या उत्पादनांची अधिकाऱ्यांकडून पाहणी
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या शेत माल संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विभाग कार्यरत झाला आहे. कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील कृषीसंगम संस्थेचा शेतमाल पुण्याला पाठवण्यात येत असताना कराड तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला, सैदापूर कृषी अधिकारी व्ही. डी. कदम, व्ही. पी. मोरे, शेती पर्यवेक्षिका एम. आर. कुंभार यांनी त्याची पाहणी केली.
यावेळी संस्थेचे संचालक संभाजी चव्हाण, हणमंत चव्हाण, मारुती चव्हाण, एल. के. पाटील, अमोल चव्हाण, शंकर पोळ, जयंत पाटील, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.
संस्थेच्यावतीने एक लाख रुपये किमतीची शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादने पुणे येथील दहा काॅप शाॅपला पाठवण्यात आली. एमसीडीसीचे यावर नियंत्रण असणार आहे.
शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून एक किलोपासून ते दहा किलोपर्यंतचे पॅकिंग करुन पाठवण्यात आला आहे .त्यामध्ये केमिकल विरहीत गूळ ,गूळ पावडर, इंद्रायणी तांदूळ, शेंगदाणा, काजू, आदींचा समावेश आहे.
कोट :
शेतकरी आणि ग्राहक जोडण्याचे काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. पिकेल ते विकेल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा शेतकरी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार आहे.
आर. एम. मुल्ला
कराड तालुका कृषी अधिकारी
फोटो ओळ :
कोपर्डे (ता. कराड) येथे कृषीसंगम संस्थेचा माल पुणे येथे जात असताना पाहणी करताना आर. एम. मुल्ला ,व्ही. डी. कदम.