शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
4
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
5
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
6
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
7
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
8
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
9
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
10
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
11
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
12
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
13
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
14
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
15
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
16
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
17
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
18
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
19
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
20
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावाहकांची घुसखोरी--परजिल्ह्यातून लोक आलेच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 13:06 IST

या कोरोनावाहक घुसखोरांमुळेच सातारा जिल्हा संकटात सापडलाय. गरीब माणूस मुकाट्याने कायद्याचे पालन करत असताना धनदांडगे मात्र शिरजोरी करून रोग पसरवत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे शस्त्र जिल्हा प्रशासनाने उगारण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देमहामार्गावरील तपासणी पथकांवर संशयाची सुई

सागर गुजर ।सातारा : कोरोना विपत्तीच्या काळात पुण्या-मुंबईतील अनेक धनिकांनी गावाकडे धूम ठोकली. ह्यधनिकाघरचे श्वान त्याला मालकाइतकाच मान...ह्ण या म्हणीचा प्रत्यय लॉकडाऊनच्या काळात आला. हे ह्यकोरोनावाहक घुसखोरह्ण लॉकडाऊनचे नियम तोडून जिल्ह्यात आलेच कसे? ह्यलक्ष्मीदर्शनह्ण दाखवून त्यांनी जर जिल्ह्यात घुसखोरी केली असेल तर अशा नतद्रष्टांना चांगलीच अद्दल घडणे आवश्यक असून, जिल्हावासीयांची आर्त हाक ऐकून जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

संपूर्ण देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा अर्थ म्हणजे कुणीही आपले शहर, गाव सोडायचे नाही. राज्य व केंद्र शासनाने केलेल्या सूचनांनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्याच्या सीमा सील केल्या. या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातून बाहेर पडू पाहणारे ऊसतोड मजूर, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील बांधकाम, फर्निचर, पेंटिंग या कामासाठी सातारा जिल्ह्यात काम करणारे मजूर यांना जिल्हा प्रशासनाने थांबवून ठेवले. या सर्व विस्थापितांना निवारा केंद्रांत दाखल करण्यात आले. ज्यांनी जिल्हा, शहर सोडून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले.

हे एका बाजूला सुरू असतानाच पुणे-मुंबई येथून लपून-छपून येणाऱ्यांचे लोंढे थांबले नाहीत. मिळेल त्या वाहनाने हे लोक जिल्ह्यातील आपल्या गावात, शहरात परतत होते. आताही कोरोनाबाधित जे लोक आढळून येत आहेत, त्यातील बहुतांश लोक हे पुणे-मुंबईतून आलेलेच लोक आहेत. या लोकांनी आपली माहिती संबंधित प्रशासनाकडे दिली नसेल तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून घेणे आवश्यक आहे. महामार्गावर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येत असताना या लोकांची तपासणी झाली नाही का? झाली असेल तर त्यांना प्रवेश कसा काय दिला? याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

या कोरोनावाहक घुसखोरांमुळेच सातारा जिल्हा संकटात सापडलाय. गरीब माणूस मुकाट्याने कायद्याचे पालन करत असताना धनदांडगे मात्र शिरजोरी करून रोग पसरवत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे शस्त्र जिल्हा प्रशासनाने उगारण्याची मागणी होत आहे.साताºयाच्या प्रशासनाने जीव तोडून मेहनत घेऊन कोरोनाला रोखून धरले आहे. या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे महापाप काही वरिष्ठ प्रशासकीय महाभागांनी केलेले आहे. महाबळेश्वरात वाधवान कुटुंबीय अशाच प्रकारे दाखल झाले होते. वरिष्ठ अधिकाºयांचे पत्र दाखवून अनेकजण लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात शिरले. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे.- चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष संकल्प सेवाभावी व इंजिनिअरिंग संस्थावरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकाºयांची शिफारस पत्रे दाखवून लोक लॉकडाऊनच्या काळात पुण्याची सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करत होते. आम्ही टोलनाक्यांवर त्यांची तपासणी केली; परंतु अनेकजण असे पत्र दाखवत होते, अशी खळबळजनक माहिती एका शासकीय कर्मचाºयाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग