वाई : वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघावर गेल्या दोन निवडणुकांमध्ये अपक्षांनीच बाजी मारली आहे. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर विजय मिळवणे माजी-माजी आमदारांना मागील दोन निवडणुकांत शक्य झालेले नाही. यावेळी ते शक्य व्हावे म्हणून आघाडी आणि युतीतील सर्वच पक्ष हातघाईवर आले आहेत.मागील निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनी राज्यात एकत्रित लढत दिली होती. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातून तत्कालीन आमदार मदन भोसले काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र, राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यामुळे मतदारसंघातील अपक्षांच्या विजयाची परंपरा कायम राहिली. तत्पूर्वी २००४ च्या निवडणुकीत मदन भोसले अपक्ष म्हणून विजयी झाले होते.प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघात सत्तेचा सारिपाट सतत बदलत गेला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्येच सरळ (अप्रत्यक्ष) लढत झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांचे पक्के वैरी झाल्याचे दिसून आले आहे. केवळ काँग्रेसच आघाडीधर्म पाळण्यास बांधील नसल्याचे स्पष्ट संकेत माजी आमदार, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिले असल्याने आगामी निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यांत निर्माण झाले आहे.केंद्रात एकहाती सत्ता मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाची देशात लाट असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. या लाटेत सामील होण्याचा आग्रह मदन भोसले यांच्याकडे कार्यकर्त्यांनी धरला असून, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन वेळा कार्यकर्त्यांचा मेळावाही आजवर घेण्यात आला आहे. मात्र, आपला निर्णय मदन भोसले यांनी अजूनही गुलदस्त्यातच ठेवला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये ‘विठ्ठला... कोणता झेंडा घेऊ हाती,’ म्हणण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीमधून विद्यमान आमदार मकरंद पाटलांना उमेदवारी दिल्याचे जाहीर करण्यात आल्याने मदन भोसले यांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजपची ताकद आजवर जास्त दिसून आलेली नाही. शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांनी लोकसभा निवडणूक अपक्ष लढविली होती. यंदाची विधानसभा निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी त्यांनीही राजकीय सारिपाटावर आपला फासा टाकला आहे. धनगर समाजाने काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान न करण्याचा निर्णय घेऊन नेत्यांची ‘हवा टाइट’ केली आहे. मात्र, मागील निवडणुकीसारखा एखाद्या भूमिपुत्राने ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात उडी मारली तर या मतदारसंघातील सामना रंगतदार ठरू शकतो. २००९ चे चित्---२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्ष आमदार मकरंद पाटील विजयी झाले. काँग्रेसचे तिकीट त्यावेळी मदन भोसले यांना मिळाले होते. मकरंद पाटील यांना २१ हजार ८२५ मतांची आघाडी मिळाली होती. एकूण मतदान १ लाख ९९ हजार ७६ इतके झाले होते. उमेदवार आणि त्यांना -मिळालेली मते :मकरंद पाटील (अपक्ष) ८०,८८७मदन भोसले (काँग्रेस) ६९,०६२पुरुषोत्तम जाधव (शिवसेना) ३५,४५२अशोक गायकवाड (रिपाइं) ८,०२५नितीन भरगुडे-पाटील (अपक्ष) ८,७१६राजाभाऊ खरात (मनसे) २,५६५दिलीप जगताप (अपक्ष) ९६२संजय कदम (अपक्ष) ४२७शिवाजी मोरे (अपक्ष) १,०२४सुधा साबळे (अपक्ष) १,५३४२००४ चे चित्र--एकूण मतदार : ३,१२,४५६४वाई - १,५६,४९४ (महिला : ७७,३९१, पुरुष : ७९,१०३)४खंडाळा - १,०४,२६५ (महिला : ४९,९७८, पुरुष : ५४,२८७)४महाबळेश्वर - ५१,६९७ (महिला : २५,९०७, पुरुष : २५,७९०)
अपक्ष, बंडखोरांच्या संख्येचाही परिणामसंजीव वरे - वाई पूर्वीच्या वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाला पुनर्रचनेत २००९ मध्ये महाबळेश्वर तालुकाही जोडला गेला. त्यामुळे हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या बरोच मोठा झाला. भौगोलिक रचना बदलूनही २००४ प्रमाणेच २००९ मध्येही अपक्ष उमेदवार विजयी झाला असल्याने २०१४ मध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मागील निवडणुकीची आकडेवारी आणि पहिल्या दोन उमेदवारांमधील मतांचे अंतर पाहता अपक्ष आणि बंडखोर उमेदवार किती, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.