शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांच्या संख्येत वाढ; उघडकीसाठीही प्रयत्न..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 22:45 IST

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात विविध गुन्हे दाखल झाले. त्यापैकीच प्रकर्षाने पुढे आलेला गुन्हा म्हणजे फलटणच्या वडजल भागामध्ये प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा झालेला खून.

ठळक मुद्दे शिक्षेचे प्रमाणही वाढले : अपघात होऊ नये यासाठी जनजागृतीची मोहीम गरजेची; हेल्मेटसक्ती हवीच

दत्ता यादव ।सातारा : रोज चोऱ्या, मारामाºया घडत आहेतच, शिवाय अपघात अन् फसवणुकीचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. रोज शंभरीच्या घरात गुन्हे दाखल होत असताना गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही आता अलीकडे वाढू लागले आहे.जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात विविध गुन्हे दाखल झाले. त्यापैकीच प्रकर्षाने पुढे आलेला गुन्हा म्हणजे फलटणच्या वडजल भागामध्ये प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा झालेला खून. या खुनाचे कसलेही पुरावे मागे नसताना पोलिसांनी तीन दिवसांत खुनाचा छडा लावून तिघांना अटक केली. या खुनामुळे फलटण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

याशिवाय शिरवळ पोलिसांनी दागिने चोरणाºया आंतरराज्य टोळीतील चौघांना गजाआड केले. गाडीमध्ये बसविलेल्या प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरटण्यात ही टोळी माहीर होती. सातारा, पुणे ग्रामीण, पुणे शहर, नवी मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी या टोळीवर दहा गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याचा शिरवळ पोलिसांनी छडा लावल्यामुळे अनेकांचा प्रवास आता सुखकर झाला आहे.खंडाळ्यातील एस वळण हे अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे. या वळणाने आत्तापर्यंत अनेकांचा जीव घेतलाय. काहींनी या वळणाला दोष दिला असून, काहींनी हे वळण योग्य असल्याचे म्हटले आहे. परंतु या वळणावर अपघात झालेल्यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

त्यापैकीच एक म्हणजे कंटेनर चालक सागर अशोक जाधव (वय २५, रा. मोही, ता. माण) याला झालेली तीन वर्षांची शिक्षा. निष्काळजीपणे आणि हयगयीने कंटेनर चालवून नऊजणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. अद्यापही या एस वळणावर अपघतांची मालिका सुरूच आहे.

अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे. मलकापूर, कºहाड येथील अज्ञात वाहनाच्या धडकेत वैद्यकीय शिक्षण घेणारा अनिरुद्ध धदीच (वय २४, रा. कोयना वसाहत, मलकापूर) याचा मृत्यू झाला. कोरेगाव येथेही अपघातात जखमी झालेल्या मयूर मोहन कदम (वय ३०, रा. कुमठे, ता. कोरेगाव) याचाही खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आयुष्य फुलण्याच्या वेळेतच तरुणांना अपघातामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक तरुण बेभान होऊन वाहने चालवतात. त्यांच्या चुकीमुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागते. यासाठी त्यांच्यावर वचक आवश्यक आहे. महामार्गावरून प्रवास करताना दुचाकीस्वाराला हेल्मेटसक्ती करायला हवी.

अनेकजण हेल्मेटचे ओझे नको म्हणून हेल्मेट घालणे टाळत असतात. मात्र, हेल्मेट त्यांच्या स्वत:च्या आयुष्यासाठी कवच आहे, हे दुचाकीस्वारांना कधी समजणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोलमजुरी करून आयुष्याची जपलेली पुंजी चोरीस गेल्यानंतर अनेक कुटुंबे रसातळाला जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्याने चोरीचा छडा लावावा, अशी अपेक्षा नागरिकांची असते.पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष..रोज अनेक गुन्हे दाखल होत असले तरी पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. अपघातांची मालिका मात्र सुरूच आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी जनजागृती चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपल्या सुरक्षिततेची काळजी स्वत: घेतली पाहिजे, असे पोलिसांकडून नेहमी आवाहन करण्यात येते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस