शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सह्याद्रीच्या गाळपक्षमतेत वाढ

By admin | Updated: May 27, 2014 01:24 IST

बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

 मसूर : उसाच्या पट्टापद्धतीमुळे व ड्रीप इरिगेशनमुळे हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याने सह्यादी्र कारखान्याचा गळित हंगाम १८६ दिवस चालला. कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. तरीही दिवसेंदिवस उसाच्या हेक्टरी उत्पादनात होणारी वाढ व वेळेत गळित हंगाम पूर्ण होण्यासाठी कारखान्याचा विस्तार करावा लागेल, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. यशवंतनगर, ता. कºहाड येथे सह्याद्री साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब यादव, संचालक पांडूरंग पाटील, संभाजी गायकवाड, संजय थोरात, लालासाहेब पाटील, संजय जगदाळे, माणिकराव पाटील, शैलजा कणसे आदी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संचालिका निर्मला चव्हाण व शहाजीराव चव्हाण यांच्या हस्ते गळीत हंगामाची सांगता झाली. आमदार पाटील पुढे म्हणाले, सद्या सहकारी साखर उद्योगासमोर अनेक अडचणी असून शिल्लक साखरेचे संकट सर्वच ठिकाणी आहे. पुढील हंगामासाठी कारखान्याकडे २२,४८३ हेक्टर ऊसाची नोंद झाली असून या हंगामात १३ लाख २८ हजार मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ९५ लाख लिटर्स डिस्टलरी उत्पादन झाले असून सरासरी हेक्टरी उत्पादन १०३ टन इतके निघाले आहे. पुढील हंगाम वेळेत पूर्ण करण्यासाठी १ आॅक्टोंबरला हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुरू असल्याचे सांगून १५ लाख मे. टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संचालक तानाजी जाधव, किशोर पाटील आदींसह पदाधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतुकदार, तोडणी यंत्रणेचे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, कत्रांटदार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक सी. एन. अहिरे यांनी केले. आभार भाऊसाहेब यादव यांनी मानले. (प्रतिनिधी)