शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रवादीत इनकमिंग; भाजपची धडपड !

By admin | Updated: November 11, 2016 23:16 IST

कोरेगाव नगरपंचायत निवडणूक : मनसे व शिवसेनेत शांतता; स्थानिक पातळीवर कॉँग्रेसचा प्रचार

साहील शहा ल्ल कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह अन्य पक्षांमध्ये उमेदवारी डावलल्याने मोठ्या प्रमाणावर आऊट गोर्इंग सुरू आहे. अनेकांनी पक्षत्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली असली तरी न्यायालयीन लढाईत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेत शांतता असून, त्यांच्या दोन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने तेथे निराशाचे वातावरण आहे. या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची कुरबूर न होता, एका विचाराने उमेदवारी अर्ज भरले गेल्याने पक्षाची ताकद आपोआप वाढली आहे. एकूणच कोरेगावात अन्य पक्षांमध्ये झालेल्या पडझडीमुळे राष्ट्रवादीत इनकमिंग असल्याचे चित्र आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी थेट इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि तेथेच त्यांनी काँग्रेसला खिंडार पाडत त्यांच्याकडील महत्त्वाचे पदाधिकारी असलेल्या प्रतिभा बर्गे, किशोर ना. बर्गे व डॉ. गणेश होळ यांना राष्ट्रवादीत आणले. त्यांच्यापाठोपाठ तरुणांना संधी या भूमिकेवर ते ठाम राहिले आणि उमेदवारी देताना त्यांनी तोच निकष लावल्याने अनेक ठिकाणी नवीन चेहरे पाहावयास मिळाले आहेत. कॉँग्रेसमधील प्रशांत गायकवाड यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली. आ. शिंदे जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांचा समेट घडवत पक्षसंघटना बळकट करण्यास सुरुवात केल्याने आणि थेट कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे कोरेगावचे माजी सरपंच अ‍ॅड. प्रभाकर बर्गे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी, शिवसेनेचे शहरप्रमुख सिद्धार्थ बर्गे यांनी त्यांच्यासमवेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात आ. शिंदे यांनी धक्कातंत्र सुरू ठेवल्याने काँग्रेस, शिवसेना व भाजपला कार्यकर्त्यांवर ॅविशेष लक्ष द्यावे लागणार आहे. काँग्रेसने सहा महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली असल्याने त्यांना उमेदवारी देताना फारसे अवघड झाले नाही. जेथे नाराज होते, त्यांनी उमेदवारीसाठी पक्षत्याग केला. मात्र, काँग्रेसने कोणतेही नुकसान झाल्याचा इन्कार केला आहे. आम्ही व्यक्तिगत संपर्क, विकासकामे यावरच भर दिला असून, निवडणुकीत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ हे वर्षानुवर्षे चालत आलेली प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने स्थानिक पातळीवर प्रचारावर भर दिला असून, वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली दिसून येत आहे. युतीची फलनिष्पती फेल ! मनसेने केवळ तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. जेथे ताकद आहे आणि जनमाणसात स्थान आहे, अशाच ठिकाणी उमेदवार दिले असून, जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य प्रभागांमध्ये मनसेचे कार्यकर्ते आपापल्या सोईनुसार निवडणुकीचे काम करत आहेत. शिवसेनेत देखील प्रचंड अस्वस्थता आहे. पालकमंत्री व संपर्क प्रमुख संपूर्ण पॅनेल तयार करण्याचे आदेश देऊन देखील त्यांना सर्वत्र उमेदवार देता आले नाहीत. शिवसेना-भाजप युतीची केवळ चर्चाच होत राहिली, त्यामध्ये फलनिष्पती झालीच नाही. सेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने ऐनवेळी सेना तोंडघशी पडली आहे. एकूणच मनसे आणि शिवसेनेत शांतता आहे. भाजपची न्यायालयीन लढाई भाजपने पहिल्यांदाच पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचा चंग बांधला; मात्र संपूर्ण १७ जागांवर त्यांना उमेदवार देता आले नाहीत, एका ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने भाजप अडचणीत आला. उमेदवार अपात्रताप्रकरणी दोन ठिकाणी भाजपने न्यायालयीन लढा दिला; मात्र एकाच ठिकाणी त्यांना यश आले आणि तेथील अवैध ठरलेला उमेदवाराचा अर्ज न्यायालयाने वैध ठरविला. दुसऱ्या लढाईत मात्र भाजपला सपशेल अपयश आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रचार सोडून भाजपला न्यायालयीन लढाई देण्यात वेळ खर्ची घालावा लागत आहे.