शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

प्रोत्साहनपर लाभार्थ्यांच्या खात्यात कमी रक्कम जमा शेतकरी कर्जमाफी योजना : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:03 IST

सातारा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत असताना काही प्रोत्साहनपर लाभार्थ्यांना कमी पैसे मिळू लागल्याच्या तक्रारी

सातारा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत असताना काही प्रोत्साहनपर लाभार्थ्यांना कमी पैसे मिळू लागल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याना याचा फटका बसणार असून, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

राज्य शासनाने जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ४० हजार शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. तर राज्य शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम टाकू, असा केलेला दावा पूर्णपणे फसला.तसेच दिवाळीनंतरही काही मोजक्याच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले. विरोधकांच्या राजकीय हल्ल्यापासून बचावासाठी नागपूर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया गतिमान केली. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होऊ लागली. ११ डिसेंबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी २३३ कोटी ६३ लाख सहा हजार ९२८ रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी १८१ कोटी २९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तसेच नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असलीतरी काहींना कमी रक्कम मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

प्रोत्साहनपर लाभाचे काही टप्पे करण्यात आले आहेत. त्यामध्ये १५ हजारांपेक्षा कमी कर्ज असणाºयांना कर्जाऐवढी रक्कम मिळणार आहे. तर १५ ते ६० हजार रुपयांच्या दरम्यान कर्जधारकांना १५ हजार आणि ६० हजारांपासून एक लाखापर्यंत कर्ज असणाºयांना कर्जाच्या २५ टक्के रक्कम मिळणार आहे. तसेच एक लाखाच्या पुढे कर्ज असणाºयांना २५ हजार रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत. सध्या शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा होत आहे; पण काहींच्या नावावर कमी रक्कम जमा होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.