शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सातारा जिल्ह्यात अपुरा पाऊस; पेरणी अवघी १४ टक्केच, शेतकरी चिंतेत

By नितीन काळेल | Updated: July 6, 2023 19:14 IST

पेरणीला वेग येण्यासाठी सर्वत्रच पावसाची आवश्यकता

सातारा : जिल्ह्यात उशिरा पाऊस सुरू होणे आणि अजूनही अनेक भागात ओढ दिल्याने खरीप हंगाम पेरणीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत फक्त १४ टक्के क्षेत्रावरच पेर झाली आहे. तर पूर्व भागात अजूनही पेरणीला वेग आलेला नाही. त्यामुळे यावर्षी १०० टक्के पेरणी होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. साधारणपणे तीन लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. यामध्ये भात, बाजरी, सोयाबीन, भुईमूग हीच मुख्य पिके असतात. यावर्षी जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १५ हजार १९०, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर आहे. तर खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे ७४ हजार ८०० हेक्टर आहे. याचबरोबर तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफूल यांचे क्षेत्र कमी आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करतात; पण यंदा मान्सूनचा पाऊसच जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झाला. सुरुवातीला पूर्व आणि पश्चिम भागात हजेरी लावली; पण नंतर पश्चिम भागातच जोर धरला. आतापर्यंत पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असलातरी पूर्वेकडे दडी आहे. यामुळे याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. आतापर्यंत फक्त १४ टक्केच पेरणी झालेली आहे. याचा अर्थ ४० हजार हेक्टरवरच पेर आहे. त्यामुळे पेरणीला वेग येण्यासाठी सर्वत्रच पावसाची आवश्यकता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी