शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सातारा जिल्ह्यात अपुरा पाऊस; पेरणी अवघी १४ टक्केच, शेतकरी चिंतेत

By नितीन काळेल | Updated: July 6, 2023 19:14 IST

पेरणीला वेग येण्यासाठी सर्वत्रच पावसाची आवश्यकता

सातारा : जिल्ह्यात उशिरा पाऊस सुरू होणे आणि अजूनही अनेक भागात ओढ दिल्याने खरीप हंगाम पेरणीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत फक्त १४ टक्के क्षेत्रावरच पेर झाली आहे. तर पूर्व भागात अजूनही पेरणीला वेग आलेला नाही. त्यामुळे यावर्षी १०० टक्के पेरणी होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. साधारणपणे तीन लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. यामध्ये भात, बाजरी, सोयाबीन, भुईमूग हीच मुख्य पिके असतात. यावर्षी जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १५ हजार १९०, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर आहे. तर खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे ७४ हजार ८०० हेक्टर आहे. याचबरोबर तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफूल यांचे क्षेत्र कमी आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करतात; पण यंदा मान्सूनचा पाऊसच जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झाला. सुरुवातीला पूर्व आणि पश्चिम भागात हजेरी लावली; पण नंतर पश्चिम भागातच जोर धरला. आतापर्यंत पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असलातरी पूर्वेकडे दडी आहे. यामुळे याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. आतापर्यंत फक्त १४ टक्केच पेरणी झालेली आहे. याचा अर्थ ४० हजार हेक्टरवरच पेर आहे. त्यामुळे पेरणीला वेग येण्यासाठी सर्वत्रच पावसाची आवश्यकता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी