शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सातारा जिल्ह्यात अपुरा पाऊस; पेरणी अवघी १४ टक्केच, शेतकरी चिंतेत

By नितीन काळेल | Updated: July 6, 2023 19:14 IST

पेरणीला वेग येण्यासाठी सर्वत्रच पावसाची आवश्यकता

सातारा : जिल्ह्यात उशिरा पाऊस सुरू होणे आणि अजूनही अनेक भागात ओढ दिल्याने खरीप हंगाम पेरणीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत फक्त १४ टक्के क्षेत्रावरच पेर झाली आहे. तर पूर्व भागात अजूनही पेरणीला वेग आलेला नाही. त्यामुळे यावर्षी १०० टक्के पेरणी होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. साधारणपणे तीन लाख हेक्टरवर पेरणी केली जाते. यामध्ये भात, बाजरी, सोयाबीन, भुईमूग हीच मुख्य पिके असतात. यावर्षी जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भाताचे सुमारे ४४ हजार हेक्टर, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, बाजरी ६० हजार ७३४ हेक्टर, मका १५ हजार १९०, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर आहे. तर खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे ७४ हजार ८०० हेक्टर आहे. याचबरोबर तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफूल यांचे क्षेत्र कमी आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करतात; पण यंदा मान्सूनचा पाऊसच जून महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झाला. सुरुवातीला पूर्व आणि पश्चिम भागात हजेरी लावली; पण नंतर पश्चिम भागातच जोर धरला. आतापर्यंत पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असलातरी पूर्वेकडे दडी आहे. यामुळे याचा परिणाम खरीप हंगामातील पेरणीवर झाला आहे. आतापर्यंत फक्त १४ टक्केच पेरणी झालेली आहे. याचा अर्थ ४० हजार हेक्टरवरच पेर आहे. त्यामुळे पेरणीला वेग येण्यासाठी सर्वत्रच पावसाची आवश्यकता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी