शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
3
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
5
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
6
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
7
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
8
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
9
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
10
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
11
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
12
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
13
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
14
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
15
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
17
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
18
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
19
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
20
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?

आशियाई महामार्गामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेला महत्त्व , एनएच 4 बनला एएच 47 : ग्वाल्हेर ते बेंगलोरपर्यंतचा प्रवास; दोन हजार किलोमीटरचे अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:34 AM

नितीन काळेल ।सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग झाल्यामुळे तीन राज्ये दळणवळणाच्या दृष्टीने आणखी जवळ येणार आहेत. सुमारे दोन हजार किलोमीटरचा हा मार्ग असून, ग्वाल्हेर ते बेंगलोर पर्यंत आहे. महामार्गामुळे दळणवळण सुलभ होणार असून, सातारा जिल्ह्यातील बाजारपेठेलाही याचा लाभ होणार आहे.रस्ते हे विकासाचा केंद्रबिंदू असतात. रस्ते चांगले असतील ...

नितीन काळेल ।सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग झाल्यामुळे तीन राज्ये दळणवळणाच्या दृष्टीने आणखी जवळ येणार आहेत. सुमारे दोन हजार किलोमीटरचा हा मार्ग असून, ग्वाल्हेर ते बेंगलोरपर्यंत आहे. महामार्गामुळे दळणवळण सुलभ होणार असून, सातारा जिल्ह्यातील बाजारपेठेलाही याचा लाभ होणार आहे.

रस्ते हे विकासाचा केंद्रबिंदू असतात. रस्ते चांगले असतील तर रहदारी, दळणवळण सुलभ होऊन जाते. तसेच चांगल्या रस्त्यामुळे गावे, शहरे आणखी जवळ येतात, असे म्हटले जाते. सातारा जिल्ह्यातही चांगले रस्ते होऊ लागले आहेत. या जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. त्यापैकी अनेक मार्गांची कामे सुरू झाली आहेत. हे महामार्ग अनेक गावे आणि शहरांना जोडण्याचे काम करीत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जातो.

या मार्गावरील वाहतूक जलद व्हावी, दळवळणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात, यासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. पूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग चार म्हणून ओळखला जात होता. आता याला आशियाई महामार्ग ४७ हे नाव मिळाले आहे. हा मार्ग तीन राज्यांतून जात आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे हा महामार्ग सुरू होत असून शिवपुरी, गुणा, देवास इंदौर (मध्यप्रदेश), नाशिक, ठाणे, मुंबई, पनवेल, पुणे, सातारा, कºहाड, कोल्हापूर (महाराष्ट्र) आणि कर्नाटकातील निपाणी, बेळगाव, धारवाड, हुबळी, दावणगिरी असा बेंगलोरपर्यंत जात आहे.

या आशियाई महामार्गाचे सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी काम सुरू आहे. सध्या हा महामार्ग सहापदरी होत आहे. यामुळे वाहतूक वेगाने होणार आहे. तसेच मोठमोठी शहरे काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. दळणवळणाच्यादृष्टीने आशियाई महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. तसेच या महामार्गाची देखभालही त्वरित होणार आहे. शिरवळ ते शेंद्रे हे अंतर पुणे विभागाच्या अंतर्गत येत असून, या अंतरातील कामे जूनपर्यंत पूर्ण होतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातूनही हा महामार्ग जात आहे. जिल्ह्यातील मार्गाचे अंतर हे सुमारे १३० किलोमीटर आहे. या आशियाई महामार्गामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेला महत्व प्राप्त होणार आहे.कोल्हापूरलाही कार्यालय...शेंद्रे (सातारा) ते कागल हे अंतर १३२ किलोमीटर इतके आहे. या मार्गावर सहा पदरीकरणाचे काम सुरू नाही. सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू झाले आहे. पुण्यानंतर कोल्हापुरात हे कार्यालय सुरू झाले आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग ४७पुणे कार्यालयांतर्गत वाढे फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरूशिरवळ ते शेंद्रेपर्यंतचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणारसहापदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढणारदोन शहरातील दळणवळणासाठी मोठा फायदा