शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

आशियाई महामार्गामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेला महत्त्व , एनएच 4 बनला एएच 47 : ग्वाल्हेर ते बेंगलोरपर्यंतचा प्रवास; दोन हजार किलोमीटरचे अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:38 IST

नितीन काळेल ।सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग झाल्यामुळे तीन राज्ये दळणवळणाच्या दृष्टीने आणखी जवळ येणार आहेत. सुमारे दोन हजार किलोमीटरचा हा मार्ग असून, ग्वाल्हेर ते बेंगलोर पर्यंत आहे. महामार्गामुळे दळणवळण सुलभ होणार असून, सातारा जिल्ह्यातील बाजारपेठेलाही याचा लाभ होणार आहे.रस्ते हे विकासाचा केंद्रबिंदू असतात. रस्ते चांगले असतील ...

नितीन काळेल ।सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग झाल्यामुळे तीन राज्ये दळणवळणाच्या दृष्टीने आणखी जवळ येणार आहेत. सुमारे दोन हजार किलोमीटरचा हा मार्ग असून, ग्वाल्हेर ते बेंगलोरपर्यंत आहे. महामार्गामुळे दळणवळण सुलभ होणार असून, सातारा जिल्ह्यातील बाजारपेठेलाही याचा लाभ होणार आहे.

रस्ते हे विकासाचा केंद्रबिंदू असतात. रस्ते चांगले असतील तर रहदारी, दळणवळण सुलभ होऊन जाते. तसेच चांगल्या रस्त्यामुळे गावे, शहरे आणखी जवळ येतात, असे म्हटले जाते. सातारा जिल्ह्यातही चांगले रस्ते होऊ लागले आहेत. या जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. त्यापैकी अनेक मार्गांची कामे सुरू झाली आहेत. हे महामार्ग अनेक गावे आणि शहरांना जोडण्याचे काम करीत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जातो.

या मार्गावरील वाहतूक जलद व्हावी, दळवळणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात, यासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. पूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग चार म्हणून ओळखला जात होता. आता याला आशियाई महामार्ग ४७ हे नाव मिळाले आहे. हा मार्ग तीन राज्यांतून जात आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे हा महामार्ग सुरू होत असून शिवपुरी, गुणा, देवास इंदौर (मध्यप्रदेश), नाशिक, ठाणे, मुंबई, पनवेल, पुणे, सातारा, कºहाड, कोल्हापूर (महाराष्ट्र) आणि कर्नाटकातील निपाणी, बेळगाव, धारवाड, हुबळी, दावणगिरी असा बेंगलोरपर्यंत जात आहे.

या आशियाई महामार्गाचे सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी काम सुरू आहे. सध्या हा महामार्ग सहापदरी होत आहे. यामुळे वाहतूक वेगाने होणार आहे. तसेच मोठमोठी शहरे काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. दळणवळणाच्यादृष्टीने आशियाई महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. तसेच या महामार्गाची देखभालही त्वरित होणार आहे. शिरवळ ते शेंद्रे हे अंतर पुणे विभागाच्या अंतर्गत येत असून, या अंतरातील कामे जूनपर्यंत पूर्ण होतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातूनही हा महामार्ग जात आहे. जिल्ह्यातील मार्गाचे अंतर हे सुमारे १३० किलोमीटर आहे. या आशियाई महामार्गामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेला महत्व प्राप्त होणार आहे.कोल्हापूरलाही कार्यालय...शेंद्रे (सातारा) ते कागल हे अंतर १३२ किलोमीटर इतके आहे. या मार्गावर सहा पदरीकरणाचे काम सुरू नाही. सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे कार्यालय सुरू झाले आहे. पुण्यानंतर कोल्हापुरात हे कार्यालय सुरू झाले आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग ४७पुणे कार्यालयांतर्गत वाढे फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरूशिरवळ ते शेंद्रेपर्यंतचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणारसहापदरीकरणामुळे वाहनांचा वेग वाढणारदोन शहरातील दळणवळणासाठी मोठा फायदा