शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

टायर वापराचे अज्ञान देतेय अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उन्हाळा वाढला की महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे एक-एक किस्से अंगावर शहारे आणतात. टायर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : उन्हाळा वाढला की महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे एक-एक किस्से अंगावर शहारे आणतात. टायर फुटल्यामुळे होणाऱ्या अपघातांत महामार्गावर दरवर्षी डझनभरांना प्राण गमवावा लागला आहे. टायरची झीज ही नुसत्या रनिंगमुळेच नव्हे, तर अलाईनमेंट, रस्त्यांची खराब स्थिती, टायरमधील कमी-जास्त हवेचा दाब, ड्रायव्हिंगची पद्धत... अशा अनेक गोष्टींमुळे होते. टायरच्या वापराविषयी असलेले अज्ञान हे याचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.

सातारा शहरातील वाहनधारकांच्या मानसिकतेचा विचार केला, तर गाडीच्या टायर्सची स्थिती आणि रिस्क यांची जाण किंवा यावर कधी कोणीच फारसे गांभीर्याने घेत नाही. एवढी वर्षे किंवा एवढे किलोमीटर्स झाले की टायर बदलणार, असं ठरवणं मुळात चुकीचं आहे. टायरची ही झीज कमी व्हावी यासाठी वेळोवेळी अलाईनमेंटवर लक्ष ठेवणे, ३ ते ५ हजार किलोमीटर्सनंतर टायर रोटेशन करणे, जास्त स्पीडमध्ये टर्न न घेणे, वेळोवेळी निव्वळ ब्रेक्सवर गाडी कंट्रोल करणे टाळावे. शक्य तितकी गीअरमध्ये कंट्रोल करण्याची सवय असावी. त्याबरोबरच एअर प्रेशरवर लक्ष ठेवणे, सस्पेंशन खराब झालं असेल किंवा अँगल चेंज झाला तरी एक टायर झिजते. मेकॅनिकच्या सल्ल्याने ते बदलावे.

टायर केव्हा बदलावे?

नक्षीच्या गॅपमध्ये मार्किंग असतं, त्या मार्किंगला नक्षी टेकली की रिस्क सुरू होते.

अलाईनमेंट खराब असेल तर एक बाजू झिजते. असा टायर वापरू नये.

खूप दिवस वापर नसेल तरी टायर्स हार्ड होतात, तेही वापरू नयेत.

ट्युबवाले टायर असतील आणि गाडी खूप दिवस एका जागी उभी राहिली, तर टायरमध्ये एअर येते आणि गाडी व्हॉयबल होते. टायरला जिथे फुगा येतो, तिथे तो फुटू शकतो किंवा तारा बाहेर येतात.

कोट :

गाडी चालविताना अनेकांचे टायरकडे दुर्लक्ष होते. पंक्चर झाल्यावरच अनेकदा टायरच्या प्रकृतीकडे लक्ष देतात. वास्तविक पाहता, उत्तम गुणवत्तेचे टायर असावेत. आठवड्यातून एकदा हवा भरणे, टायर व्यवस्थित रोजच्या रोज तपासणे, कमी हवेत गाडी न चालवणे याचे पथ्य पाळले गेले पाहिजे. पेट्रोल पंपावरील यंत्र कधी कधी चुकीचे मापन दर्शवते. त्यामुळेही टायरची झीज होते.

- फिरोज शेख, व्यावसायिक, सातारा

रिमोल्ड टायरचे दुखणे!

सरासरी कोणत्याही चारचाकीच्या नव्या आणि रिमोल्ड केलेल्या टायरमध्ये जास्तीत जास्त तीन ते साडेतीन हजार रुपयांचा फरक असतो. याचा सरासरी हिशेब केला, तर प्रति किलोमीटर जेमतेम २५ पैसे वाचत असावेत. विशेष म्हणजे टायर फुटून अपघात झाला, तर विमा कंपनी याची नुकसान भरपाई देत नाही. खराब टायर्समुळे गाडीचा स्मूथनेस कमी होतो. ग्रीप कमी झाल्याने स्टेबलिटी राहत नाही, सस्पेन्शन कमी जाणवतं, माईलेज कमी होतं. या सगळ्याचा हिशेब केला, तर आपण जे पैसे वाचवतो किंवा याचं गांभीर्य लक्षात न घेता टाळाटाळ वा आळस करतो, त्यापेक्षा खूप जास्त रिस्क घेत असतो किंवा जास्त किंमत मोजत असतो.

टायर न बदलण्याची कारणे...

अजून एक पाऊस तरी जायला हवा

(खरं तर ग्रीपची गरज पावसातच जास्त असते)

मी कुठे गाडी पळवतोय?

माझं रनिंग जास्त नाही

टायरवर खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत (घसरून पडल्यास गाडी दुरुस्ती आणि डॉक्टरला द्यायला मात्र आहेत.)

तुझं टायरचं दुकान आहे का? की तुला टायरवाले कमिशन देतात?