शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

टायर वापराचे अज्ञान देतेय अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उन्हाळा वाढला की महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे एक-एक किस्से अंगावर शहारे आणतात. टायर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : उन्हाळा वाढला की महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे एक-एक किस्से अंगावर शहारे आणतात. टायर फुटल्यामुळे होणाऱ्या अपघातांत महामार्गावर दरवर्षी डझनभरांना प्राण गमवावा लागला आहे. टायरची झीज ही नुसत्या रनिंगमुळेच नव्हे, तर अलाईनमेंट, रस्त्यांची खराब स्थिती, टायरमधील कमी-जास्त हवेचा दाब, ड्रायव्हिंगची पद्धत... अशा अनेक गोष्टींमुळे होते. टायरच्या वापराविषयी असलेले अज्ञान हे याचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.

सातारा शहरातील वाहनधारकांच्या मानसिकतेचा विचार केला, तर गाडीच्या टायर्सची स्थिती आणि रिस्क यांची जाण किंवा यावर कधी कोणीच फारसे गांभीर्याने घेत नाही. एवढी वर्षे किंवा एवढे किलोमीटर्स झाले की टायर बदलणार, असं ठरवणं मुळात चुकीचं आहे. टायरची ही झीज कमी व्हावी यासाठी वेळोवेळी अलाईनमेंटवर लक्ष ठेवणे, ३ ते ५ हजार किलोमीटर्सनंतर टायर रोटेशन करणे, जास्त स्पीडमध्ये टर्न न घेणे, वेळोवेळी निव्वळ ब्रेक्सवर गाडी कंट्रोल करणे टाळावे. शक्य तितकी गीअरमध्ये कंट्रोल करण्याची सवय असावी. त्याबरोबरच एअर प्रेशरवर लक्ष ठेवणे, सस्पेंशन खराब झालं असेल किंवा अँगल चेंज झाला तरी एक टायर झिजते. मेकॅनिकच्या सल्ल्याने ते बदलावे.

टायर केव्हा बदलावे?

नक्षीच्या गॅपमध्ये मार्किंग असतं, त्या मार्किंगला नक्षी टेकली की रिस्क सुरू होते.

अलाईनमेंट खराब असेल तर एक बाजू झिजते. असा टायर वापरू नये.

खूप दिवस वापर नसेल तरी टायर्स हार्ड होतात, तेही वापरू नयेत.

ट्युबवाले टायर असतील आणि गाडी खूप दिवस एका जागी उभी राहिली, तर टायरमध्ये एअर येते आणि गाडी व्हॉयबल होते. टायरला जिथे फुगा येतो, तिथे तो फुटू शकतो किंवा तारा बाहेर येतात.

कोट :

गाडी चालविताना अनेकांचे टायरकडे दुर्लक्ष होते. पंक्चर झाल्यावरच अनेकदा टायरच्या प्रकृतीकडे लक्ष देतात. वास्तविक पाहता, उत्तम गुणवत्तेचे टायर असावेत. आठवड्यातून एकदा हवा भरणे, टायर व्यवस्थित रोजच्या रोज तपासणे, कमी हवेत गाडी न चालवणे याचे पथ्य पाळले गेले पाहिजे. पेट्रोल पंपावरील यंत्र कधी कधी चुकीचे मापन दर्शवते. त्यामुळेही टायरची झीज होते.

- फिरोज शेख, व्यावसायिक, सातारा

रिमोल्ड टायरचे दुखणे!

सरासरी कोणत्याही चारचाकीच्या नव्या आणि रिमोल्ड केलेल्या टायरमध्ये जास्तीत जास्त तीन ते साडेतीन हजार रुपयांचा फरक असतो. याचा सरासरी हिशेब केला, तर प्रति किलोमीटर जेमतेम २५ पैसे वाचत असावेत. विशेष म्हणजे टायर फुटून अपघात झाला, तर विमा कंपनी याची नुकसान भरपाई देत नाही. खराब टायर्समुळे गाडीचा स्मूथनेस कमी होतो. ग्रीप कमी झाल्याने स्टेबलिटी राहत नाही, सस्पेन्शन कमी जाणवतं, माईलेज कमी होतं. या सगळ्याचा हिशेब केला, तर आपण जे पैसे वाचवतो किंवा याचं गांभीर्य लक्षात न घेता टाळाटाळ वा आळस करतो, त्यापेक्षा खूप जास्त रिस्क घेत असतो किंवा जास्त किंमत मोजत असतो.

टायर न बदलण्याची कारणे...

अजून एक पाऊस तरी जायला हवा

(खरं तर ग्रीपची गरज पावसातच जास्त असते)

मी कुठे गाडी पळवतोय?

माझं रनिंग जास्त नाही

टायरवर खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत (घसरून पडल्यास गाडी दुरुस्ती आणि डॉक्टरला द्यायला मात्र आहेत.)

तुझं टायरचं दुकान आहे का? की तुला टायरवाले कमिशन देतात?