शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

टायर वापराचे अज्ञान देतेय अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उन्हाळा वाढला की महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे एक-एक किस्से अंगावर शहारे आणतात. टायर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : उन्हाळा वाढला की महामार्गावर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे एक-एक किस्से अंगावर शहारे आणतात. टायर फुटल्यामुळे होणाऱ्या अपघातांत महामार्गावर दरवर्षी डझनभरांना प्राण गमवावा लागला आहे. टायरची झीज ही नुसत्या रनिंगमुळेच नव्हे, तर अलाईनमेंट, रस्त्यांची खराब स्थिती, टायरमधील कमी-जास्त हवेचा दाब, ड्रायव्हिंगची पद्धत... अशा अनेक गोष्टींमुळे होते. टायरच्या वापराविषयी असलेले अज्ञान हे याचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.

सातारा शहरातील वाहनधारकांच्या मानसिकतेचा विचार केला, तर गाडीच्या टायर्सची स्थिती आणि रिस्क यांची जाण किंवा यावर कधी कोणीच फारसे गांभीर्याने घेत नाही. एवढी वर्षे किंवा एवढे किलोमीटर्स झाले की टायर बदलणार, असं ठरवणं मुळात चुकीचं आहे. टायरची ही झीज कमी व्हावी यासाठी वेळोवेळी अलाईनमेंटवर लक्ष ठेवणे, ३ ते ५ हजार किलोमीटर्सनंतर टायर रोटेशन करणे, जास्त स्पीडमध्ये टर्न न घेणे, वेळोवेळी निव्वळ ब्रेक्सवर गाडी कंट्रोल करणे टाळावे. शक्य तितकी गीअरमध्ये कंट्रोल करण्याची सवय असावी. त्याबरोबरच एअर प्रेशरवर लक्ष ठेवणे, सस्पेंशन खराब झालं असेल किंवा अँगल चेंज झाला तरी एक टायर झिजते. मेकॅनिकच्या सल्ल्याने ते बदलावे.

टायर केव्हा बदलावे?

नक्षीच्या गॅपमध्ये मार्किंग असतं, त्या मार्किंगला नक्षी टेकली की रिस्क सुरू होते.

अलाईनमेंट खराब असेल तर एक बाजू झिजते. असा टायर वापरू नये.

खूप दिवस वापर नसेल तरी टायर्स हार्ड होतात, तेही वापरू नयेत.

ट्युबवाले टायर असतील आणि गाडी खूप दिवस एका जागी उभी राहिली, तर टायरमध्ये एअर येते आणि गाडी व्हॉयबल होते. टायरला जिथे फुगा येतो, तिथे तो फुटू शकतो किंवा तारा बाहेर येतात.

कोट :

गाडी चालविताना अनेकांचे टायरकडे दुर्लक्ष होते. पंक्चर झाल्यावरच अनेकदा टायरच्या प्रकृतीकडे लक्ष देतात. वास्तविक पाहता, उत्तम गुणवत्तेचे टायर असावेत. आठवड्यातून एकदा हवा भरणे, टायर व्यवस्थित रोजच्या रोज तपासणे, कमी हवेत गाडी न चालवणे याचे पथ्य पाळले गेले पाहिजे. पेट्रोल पंपावरील यंत्र कधी कधी चुकीचे मापन दर्शवते. त्यामुळेही टायरची झीज होते.

- फिरोज शेख, व्यावसायिक, सातारा

रिमोल्ड टायरचे दुखणे!

सरासरी कोणत्याही चारचाकीच्या नव्या आणि रिमोल्ड केलेल्या टायरमध्ये जास्तीत जास्त तीन ते साडेतीन हजार रुपयांचा फरक असतो. याचा सरासरी हिशेब केला, तर प्रति किलोमीटर जेमतेम २५ पैसे वाचत असावेत. विशेष म्हणजे टायर फुटून अपघात झाला, तर विमा कंपनी याची नुकसान भरपाई देत नाही. खराब टायर्समुळे गाडीचा स्मूथनेस कमी होतो. ग्रीप कमी झाल्याने स्टेबलिटी राहत नाही, सस्पेन्शन कमी जाणवतं, माईलेज कमी होतं. या सगळ्याचा हिशेब केला, तर आपण जे पैसे वाचवतो किंवा याचं गांभीर्य लक्षात न घेता टाळाटाळ वा आळस करतो, त्यापेक्षा खूप जास्त रिस्क घेत असतो किंवा जास्त किंमत मोजत असतो.

टायर न बदलण्याची कारणे...

अजून एक पाऊस तरी जायला हवा

(खरं तर ग्रीपची गरज पावसातच जास्त असते)

मी कुठे गाडी पळवतोय?

माझं रनिंग जास्त नाही

टायरवर खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत (घसरून पडल्यास गाडी दुरुस्ती आणि डॉक्टरला द्यायला मात्र आहेत.)

तुझं टायरचं दुकान आहे का? की तुला टायरवाले कमिशन देतात?