शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान

By प्रमोद सुकरे | Updated: November 25, 2022 19:41 IST

साताऱ्याला आज पर्यंत जाणत्या राजाने काहीच दिलं नाही. उलट सातारचं पाणी, धरण सगळं पळवलं

कऱ्हाड : राज्यातील सरकार अडीच वर्ष नक्की कोण चालवत होते हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे सरकार असतानाही शिवसैनिकांवरच अन्याय होत होता. म्हणून तर या ५० बहाद्दरांनी मला हा निर्णय घ्यायला लावला. गेल्या ४ महिन्यात आम्ही लोकहिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होत आहे. काहीही टीका सुरू आहे. पण त्यांनी टीका करण्यापेक्षा हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवावे असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले.कऱ्हाड येथे शुक्रवारी आयोजित जाहिर मेळाव्यात यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांच्या आघाडीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे यांच्यासह बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी केली असा आरोप आमच्यावर करतात; पण खरंतर टीका करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी केली आहे. आम्ही तर त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. आम्ही जे करायचं ते उघड करतो. लपून-छपून काहीच करीत नाही. मी फक्त काम करत राहणार व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे.बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मीरमधील ३७० कलम हटवून दाखवतो. ते तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवले आहे. तर राम मंदिर चे बांधकाम ही पूर्ण होत आहे. म्हणून बाळासाहेबांचे तेच विचार पुढे घेऊन आम्ही निघालो आहोत. अशावेळी टीकाकारांनी  गजानन कीर्तिकर, रामदास कदम यासारखे नेते माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर  का येतात याचे आत्मचिंतन केले तर बरे होईल असा सल्लाही त्यांनी दिला.कितीही संकटे आली तरी आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करणार नाही. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हाच विश्वास मी सगळ्यांना देतोय तो लोकांना पटतोय म्हणून तर दररोज पक्षप्रवेश होत आहेत.राज्यात आम्ही भाजप- शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो होतो .पण निवडणुकीचा निकाल लागला की लगेच आमच्या नेत्यांनी आम्हाला सगळे मार्ग रिकामे आहेत असे सांगून टाकले. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देत  विरोधकांशी आघाडी केली. पण आम्ही घेतलेल्या निर्णयाने तुमची खोकी बंद झाली म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करीत आहात; हे जनता आता जाणून आहे.

जाणत्या राजांना सगळं पळवलं ..साताऱ्याला आज पर्यंत जाणत्या राजाने काहीच दिलं नाही. उलट सातारचं पाणी, धरण सगळं पळवलं. त्यांनी नेहमीच आपल्या सर्वांना फसवलं अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.

सातारचा नेतृत्व मोठ कराएकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसातलं नेतृत्व आहे. ते सातारचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी इथल्या जनतेने ठाम उभे राहून सातारचे नेतृत्व मोठं केलं पाहिजे असं आवाहन आमदार शहाजी पाटील यांनी यावेळी केले.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीकराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना उद्देशून एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही ज्या विश्वासाने माझ्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. कराडच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. मी घेणारा नाही तर देणारा माणूस आहे.

आम्ही वन्डे खेळणारे खेळाडूआम्ही टेस्ट मॅच खेळणारे नाही तर वनडे;२०/२० मॅच खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाँलमध्ये जादा रन कशा काढायचा हे आम्हाला चांगले माहित आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना