शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

या चुका केल्या तर तिसरी लाट अटळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST

सातारा : सातारा जिल्ह्याची कोरोना परिस्थिती गंभीर वळणावर आली असताना जिल्हा प्रशासनाकडून चुकांची सातत्याने पुनरावृत्ती केली जात आहे. त्यामुळे ...

सातारा : सातारा जिल्ह्याची कोरोना परिस्थिती गंभीर वळणावर आली असताना जिल्हा प्रशासनाकडून चुकांची सातत्याने पुनरावृत्ती केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबण्याऐवजी ते वाढतच चालले आहे. या चुका अशाच होत राहिल्या तर कोरोनाची तिसरी लाट रोखणे अत्यंत जिकरीचे होऊ शकते.

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. यामध्ये सातारा जिल्हा सर्वात पुढे आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे मृतांचे प्रमाणही चिंतेची बाब बनली आहे. गतवर्षी लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर नागरिक, व्यापारी, दुकानदार, वाहनधारक अशा सर्वांकडून कोरोना नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले. प्रशासनानेदेखील ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला.

पहिल्या लाटेत जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर काम केले गेले. कोरोना रोखण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला. रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रशासन अशा उपाययोजना राबविण्यास कमी पडल्याने कोरोनाचा जिल्ह्यात विस्फोट झाला. आता तिसरी लाट जर थांबवायची असेल तर प्रशासनाने चुकांची पुनरावृत्ती करून चालणार नाही.

(पॉईंटर)

१. संचारबंदीचे निर्बंध शिथील झाल्यानंतर नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली आणि पुन्हा संक्रमण वाढले.

२. गृह अलगीकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात होती. हे रुग्ण निर्बंध असतानाही घराबाहेर पडले.

३. कार्यक्रमांना बंदी असली तरी लपूनछपून लग्न सोहळा व कार्यक्रम होत राहिले. या गर्दीतून नागरिक कोरोना घरी घेऊन गेले.

४. जिल्हाबंदीचे निर्बंध कठोर नाहीत. कोणीही, केव्हाही, कुठूनही येऊ शकतो. तसेच येणाऱ्याची नोंदही ठेवली जात नाही.

५. गृहभेटीद्वारे नागरिकांचे सर्वेक्षण बंद करण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्र नावापुरतेच करण्यात आले.

(चौकट)

पालिकेच्या दोन पथकांची असेल नजर

- संचारबंदी शिथील झाल्यानंतर शहरातील बारीकसारीक गोष्टींवर सातारा पालिकेकडून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी पालिकेने प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली आहेत.

- फिजिकल डिस्टन्स, बाजारपेठेतील गर्दी, मास्क न घालणारे नागरिक अशांवर या पथकाची करडी नजर असणार आहे.

- शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

- शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक हालचालींवर पथक लक्ष ठेवणार आहे. याशिवाय वॉर रूमच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणींची सोडवणूक केली जाणार आहे.

(पॉईंटर)

पहिला अनलॉक

दिनांक : ४ ऑगस्ट २०२०

एकूण कोरोना रुग्ण : ४,५६१

मृत्यू : १३९

(पॉईंटर)

दुसरा अनलॉक

दिनांक : १ जून २०२१

एकूण कोरोना रुग्ण : १,६७,७९२

मृत्यू : ३,६९८

फोटो : ०२ जावेद खान ०१

सातारा जिल्ह्यातील संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असले तरी नागरिक, वाहनधारक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.