शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शिवसेनेने आघाडीसमोर प्रस्ताव ठेवल्यास निश्चित चर्चा करू :पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 17:56 IST

भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली व त्यांना निसटता कौलही मिळालाय. त्यामुळे स्थिर सरकार देण्याची जबाबदारी आता दोघांचीही आहे. तरीही त्यांच्यातील सरकार स्थापनेतील वाटाघाटी फिसकटल्या आणि शिवसेनेने आघाडीसमोर ठोस प्रस्ताव ठेवला तर त्याबाबत मित्रपक्षांसह पक्षश्रेष्ठींशी निश्चितपणे चर्चा करू, अशी भूमिकाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्दे शिवसेनेने आघाडीसमोर प्रस्ताव ठेवल्यास निश्चित चर्चा करू :पृथ्वीराज चव्हाण राज्यात युतीला निसटता कौल; स्थिर सरकार देण्याची जबाबदारी दोघांचीही

कऱ्हाड /मलकापूर : भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली व त्यांना निसटता कौलही मिळालाय. त्यामुळे स्थिर सरकार देण्याची जबाबदारी आता दोघांचीही आहे. तरीही त्यांच्यातील सरकार स्थापनेतील वाटाघाटी फिसकटल्या आणि शिवसेनेने आघाडीसमोर ठोस प्रस्ताव ठेवला तर त्याबाबत मित्रपक्षांसह पक्षश्रेष्ठींशी निश्चितपणे चर्चा करू, अशी भूमिकाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात निवडणूक निकालानंतर आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषदेच्या सदस्या मंगला गलांडे, पंचायत समितीचे सदस्य नामदेव पाटील, उत्तमराव पाटील, शिवराज मोरे, जयवंत जगताप, इंद्रजित चव्हाण, नानासाहेब पाटील, अ‍ॅड. नरेंद्र पाटील, कऱ्हाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, श्रीकांत मुळे, आपीपा माने, मोहनराव शिंगाडे, नारायण रैनाक आदी उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही आपापले मतदारसंघ पदरात घेण्याचे नियोजन केले होते. तर शरद पवार यांच्याप्रमाणे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या अजून सभा झाल्या असत्या तर सत्तांतर झाले असते. आताच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे.

आजपासून जनतेच्या कामांसाठी सज्ज झालोय. ज्यांनी मतं दिली आणि ज्यांनी दिली नाहीत त्या सर्वांचाच मी प्रतिनिधी आहे. कऱ्हाड दक्षिणेतील जनतेचे आभार मानून हा प्रतिनिधी यापुढे कोणताही भेदभाव न करता गरजेनुसार कामे करण्यास बांधील आहे.सध्या राज्यात परिस्थिती गंभीर आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सरकार स्थापनेला उशीर करता कामा नये, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, ह्यशिवसेना नेते सत्तेतील ५० टक्के वाट्याबाबत बोलत असून, ते भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेत तसे ठरल्याचे सांगतात. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशा कोणत्याही गुप्त वाटाघाटी झाल्या नसल्याचा दावा करतात. त्यामुळे दोघांपैकी एकजण निश्चितपणे खोटे बोलत आहे.

सध्या महाराष्ट्रातील जनतेला झुलवत ठेवण्यापेक्षा भाजप-सेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन काय ठरलंय ते सांगावे. आत्ताच जर एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण झाला तर हे सरकार कसे स्थापन होईल, याबाबत शंका आहे.ह्णवंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आघाडीला २५ ठिकाणी फटका बसला, हे खरे आहे. मात्र, त्या मतदारसंघात वंचितऐवजी आपले आमदार निवडून आणण्यासाठी महायुतीलाच फायदा झालाय. लोकसभा निवडणुकीवेळीही आम्ही वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करण्यासाठी तयार होतो.

आम्ही एकत्र लढलो असतो तर स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार झाले असते. तसेच त्यांचे अन्य सहा ते सातजण विजयी झाले असते. वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष विस्तारवाढीला आमचा विरोध नाही. मात्र, विधिमंडळात राहून आपण आपला पक्ष वाढवावा, एवढेच आम्ही त्यांना सांगत होतो, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.काँग्रेस मजबूत झाली पाहिजे...अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी भेटून माझे अभिनंदन केले. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे ३५ वर्षे आमदार होते. त्यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव निवडणुकीत उभे होते. त्यांना पडलेली मते ही काँग्रेसची आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी मला येऊन भेटून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस मजबूत झाली पाहिजे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ते काँग्रेसच्या विचाराचे असल्याने त्यांचे मी आभार मानतो, असेही चव्हाण यांनी सांगितले.भाजपच्या सत्तेचा अहंकार उतरवला...महाराष्ट्रातील निकाल पाहता भाजपच्या विरोधी कौल दिला गेला आहे. सत्तेचा गैरवापर, पैशाचा दुरुपयोग जनता सहन करीत नाही. जनतेला कुणी गृहीत धरू नये, हाही संदेश राज्यातील जनतेने दिला आहे. त्यातून भाजपच्या सत्तेचा अहंकारही जनतेने खाली उतरवलाय, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर