शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

सातारा : साखर आणि गूळ दोन्हीही गोडच. पण, आता गुळाने दरातही साखरेवर मात केली आहे. होलसेल व किरकोळ बाजारातही ...

सातारा : साखर आणि गूळ दोन्हीही गोडच. पण, आता गुळाने दरातही साखरेवर मात केली आहे. होलसेल व किरकोळ बाजारातही गुळाला अधिक दर मिळत आहे. कोरोनामुळे तर सेंद्रिय गुळाला मागणी अधिक असून किलोचा दर ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

जिल्ह्यातील काही भागात गुऱ्हाळ घरे आहेत. दरवर्षी दिवाळीनंतर या गुऱ्हाळघरांची घरघर सुरू होते. या गुऱ्हाळघरातील गूळ जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत जातो. तसेच बाहेरही पाठविण्यात येतो. गुळालाही चांगली मागणी असते. पूर्वी गरिबांच्या घरी गूळ, श्रीमंताच्या दारी साखर असे म्हटले जात होते. पण, आता गूळ साखरपेक्षा अधिक पसंदी घेताना दिसून येत आहे.

मागील काही वर्षांचा विचार करता साखरेपेक्षा गुळानेच अधिक भाव खाल्ला असल्याचे दिसून येत आहे. साखरेच्या दरात थोडा फार चढउतार होतो. पण, गुळाला मागणी कायम असल्याने दरात सुधारणाच होत गेली आहे. त्यातच आता सेंद्रिय गूळही बाजारपेठेत येतो. या गुळाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे सेंद्रिय गुळाचा दर ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे.

कोरोना काळात सेंद्रिय गुळाला मागणी आहे. कारण, आरोग्यासाठी हा गूळ महत्त्वपूर्ण ठरत आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी गुळाचा चहाही मिळत आहे. लोकही आवडीने गुळाचा चहा पितात. त्यामुळेही गुळाला मागणी कायम असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

असा वाढला गुळाचा भाव

वर्ष साखर गूळ

२००० १४ १४

२००५ १८ १६

२०१० ३० २८

२०१५ ३२ ३०

२०२० ३५ ४०

२०२१ ३५ ५०

.....................................

आता गुळाचा चहा बनला स्टेटस्

- सध्या साखरेच्या चहापेक्षा गुळाच्या चहाला अधिक पसंदी मिळत आहे. पूर्वी साखर परवडत नव्हती म्हणून गुळाचा चहा केला जात होता. आता गुळाचा चहा प्रतिष्ठेचा बनला आहे. त्याचबरोबर गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

- गुळात साखरच्या तुलनेत भरपूर जीवनसत्त्वे असतात. ही जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

- गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. शरीररात रक्ताची कमतरता असेल तर मग गुळाचा चहा ही समस्या दूर करतो, असे म्हटले जाते.

........................................................

गावात मात्र साखरच...

ग्रामीण भागात साखरेचा चहा पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साखरेलाच पसंती मिळते. तर गुळाचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी आहे. तरीही अलीकडील काळात गुळाचा वापर होताना दिसून येत आहे.

- प्रभाकर पाटील, दुकानदार

......................

शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी...

मागील काही वर्षांचा विचार करता गुळाला मागणी वाढत चालली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात गुळाला पसंती आहे. याला कारण म्हणजे आरोग्यासाठी नागरिक गूळ खरेदी करतात. साखरेचे प्रमाण कमी होत आहे.

- संजय भोईटे, दुकानदार

...........................

साखरेच्या तुलनेत गुळाला मागणी आहे. त्यामुळे गुळाचे दर वाढत चालले आहेत. त्यातच लोकांकडून सेंद्रिय गुळाला मागणी अधिक असते. कारण, हा गूळ आरोग्यासाठी चांगला असतो.

- प्रवीण पवार, दुकानदार

......................................

साखरेपक्षा गूळ कधीही चांगला ठरतो. चांगल्या आरोग्यासाठी गुळाचा वापर करणे महत्त्वाचे असते. कारण, गुळातून अधिक चांगले घटक मिळतात. यामुळे गुळाचा आहारात वापर करणे हिताचे ठरते, असे आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

......................................................................