शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

सातारा : साखर आणि गूळ दोन्हीही गोडच. पण, आता गुळाने दरातही साखरेवर मात केली आहे. होलसेल व किरकोळ बाजारातही ...

सातारा : साखर आणि गूळ दोन्हीही गोडच. पण, आता गुळाने दरातही साखरेवर मात केली आहे. होलसेल व किरकोळ बाजारातही गुळाला अधिक दर मिळत आहे. कोरोनामुळे तर सेंद्रिय गुळाला मागणी अधिक असून किलोचा दर ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

जिल्ह्यातील काही भागात गुऱ्हाळ घरे आहेत. दरवर्षी दिवाळीनंतर या गुऱ्हाळघरांची घरघर सुरू होते. या गुऱ्हाळघरातील गूळ जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत जातो. तसेच बाहेरही पाठविण्यात येतो. गुळालाही चांगली मागणी असते. पूर्वी गरिबांच्या घरी गूळ, श्रीमंताच्या दारी साखर असे म्हटले जात होते. पण, आता गूळ साखरपेक्षा अधिक पसंदी घेताना दिसून येत आहे.

मागील काही वर्षांचा विचार करता साखरेपेक्षा गुळानेच अधिक भाव खाल्ला असल्याचे दिसून येत आहे. साखरेच्या दरात थोडा फार चढउतार होतो. पण, गुळाला मागणी कायम असल्याने दरात सुधारणाच होत गेली आहे. त्यातच आता सेंद्रिय गूळही बाजारपेठेत येतो. या गुळाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे सेंद्रिय गुळाचा दर ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे.

कोरोना काळात सेंद्रिय गुळाला मागणी आहे. कारण, आरोग्यासाठी हा गूळ महत्त्वपूर्ण ठरत आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी गुळाचा चहाही मिळत आहे. लोकही आवडीने गुळाचा चहा पितात. त्यामुळेही गुळाला मागणी कायम असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

असा वाढला गुळाचा भाव

वर्ष साखर गूळ

२००० १४ १४

२००५ १८ १६

२०१० ३० २८

२०१५ ३२ ३०

२०२० ३५ ४०

२०२१ ३५ ५०

.....................................

आता गुळाचा चहा बनला स्टेटस्

- सध्या साखरेच्या चहापेक्षा गुळाच्या चहाला अधिक पसंदी मिळत आहे. पूर्वी साखर परवडत नव्हती म्हणून गुळाचा चहा केला जात होता. आता गुळाचा चहा प्रतिष्ठेचा बनला आहे. त्याचबरोबर गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

- गुळात साखरच्या तुलनेत भरपूर जीवनसत्त्वे असतात. ही जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

- गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. शरीररात रक्ताची कमतरता असेल तर मग गुळाचा चहा ही समस्या दूर करतो, असे म्हटले जाते.

........................................................

गावात मात्र साखरच...

ग्रामीण भागात साखरेचा चहा पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साखरेलाच पसंती मिळते. तर गुळाचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी आहे. तरीही अलीकडील काळात गुळाचा वापर होताना दिसून येत आहे.

- प्रभाकर पाटील, दुकानदार

......................

शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी...

मागील काही वर्षांचा विचार करता गुळाला मागणी वाढत चालली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात गुळाला पसंती आहे. याला कारण म्हणजे आरोग्यासाठी नागरिक गूळ खरेदी करतात. साखरेचे प्रमाण कमी होत आहे.

- संजय भोईटे, दुकानदार

...........................

साखरेच्या तुलनेत गुळाला मागणी आहे. त्यामुळे गुळाचे दर वाढत चालले आहेत. त्यातच लोकांकडून सेंद्रिय गुळाला मागणी अधिक असते. कारण, हा गूळ आरोग्यासाठी चांगला असतो.

- प्रवीण पवार, दुकानदार

......................................

साखरेपक्षा गूळ कधीही चांगला ठरतो. चांगल्या आरोग्यासाठी गुळाचा वापर करणे महत्त्वाचे असते. कारण, गुळातून अधिक चांगले घटक मिळतात. यामुळे गुळाचा आहारात वापर करणे हिताचे ठरते, असे आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

......................................................................