शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो फूट बोअर मारूनही हातात कोरडी मातीच !

By admin | Updated: March 18, 2016 23:57 IST

भीषण टंचाई : कुसूर परिसरात तीन गावांसह आठ वाड्या तहानलेल्या; मार्चमध्येच चाललीय वणवण भटकंती--खोल-खोल पाणी !

गणेश काटेकर -- कुसूरकऱ्हाड-पाटणच्या हद्दीवरील डोंगर कपारीत वसलेल्या तारुख गावच्या वाड्या-वस्त्यांमध्ये दोन महिन्यांपासून पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासह पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कुसूर, कोळेवाडी, तारुखसह परिसरात बामणवाडी, वानरवाडी, पवारवाडी, शिबेवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी, खड्याचीवाडी आदी वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर कुसूर, कोळेवाडी, तारुख आणि इतर वाड्या-वस्त्या डोंगर पायथ्याशी वसल्या आहेत. या वाड्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासलेले आहे. तारुख गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर वांग नदी पात्राशेजारी असल्याने सध्यातरी पाणीटंचाई भासत नाही. मात्र नदीपात्रातील पाणीसाठा पूर्ण संपुष्टात आल्याने नदी कोरडी ठणठणीत झाली आहे. परिणामी, काही दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कुसूर आणि कोळेवाडी या गावांच्या काही अंतरावरून वांग नदी वाहत असली तरी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी नदीपात्रापासून दूर असल्याने विहिरीतील तळ दिसू लागले आहेत. कोळेवाडी येथील विहिरीत एका बोअरवेलमधून पाणी उचलून चार दिवस साठा करून गावात पिण्यासाठी सोडले जात आहे. तर कुसूर गावाला आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. वानरवाडीसह बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व वाड्या डोंगर पायथ्यालगत वसल्या आहेत. बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी, शिबेवाडी, कारंडेवाडी आणि पवारवाडीसाठी वेगवेगळ्या तीन विहिरींतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र, तिन्ही विहिरींना पाणी नसल्याने आठ दिवसांतून एकदा विहिरीत उपलब्ध झालेले पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे. वानरवाडी विहीर पाझर तलावाशेजारी असल्याने सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही. मात्र, बारमाही पाणी असलेल्या वानरवाडी पाझर तलावाची पाणी पातळी प्रथमच कमालीची घटली आहे. त्यामुळे तलावाचा तळ दिसू लागला आहे. बोअर मारूनही हाती भुसापाण्याची तीव्र टंचाई भासू लागल्याने विहिरीतील गाळ काढणे, पाणी स्त्रोत शोधण्यासाठी आडवी बोअर मारणे, उभी बोअरवेल पाडून पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. मात्र, भूगर्भातील पाणी पातळीच खालावल्याने या प्रयत्नांनाही यश येत नसल्याचे दिसते. पाझर तलावाला गळतीकुसूरसह परिसरातील वाडी-वस्तीमध्ये उसाला प्राधान्य दिले जायचे; मात्र गत काही वर्षांपासून पाण्याच्या कमतरतेमुळे या विभागात ऊसपीक घेतलेच जात नाही. विहिरी, बोअरवेल कोरडे पडल्याने शेतीला पाणी आणायचे कोठून, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. बामणवाडी आणि कारंडेवाडी येथे पाझर तलाव आहेत. मात्र ते गळतीमुळे असूनही नसल्यात जमा आहेत. पावसाळ्याचे प्रवाह आटत असताना या तलावातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे.