शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बारसे कोणीही घातलं तरी पोरगं आमचंच:जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:06 IST

म्हसवड : ‘उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माझ्या माण आणि खटाव तालुक्यांच्या हक्काचं आहे. इथल्या मातीची आणि जनतेची तहान भागल्याशिवाय या पाण्याचा एक थेंबही देवापूरच्या पुढे जाऊ देणार नाही,’ असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. या पाण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम आणि संघर्ष केला आहे, त्यामुळे पाणी ...

म्हसवड : ‘उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माझ्या माण आणि खटाव तालुक्यांच्या हक्काचं आहे. इथल्या मातीची आणि जनतेची तहान भागल्याशिवाय या पाण्याचा एक थेंबही देवापूरच्या पुढे जाऊ देणार नाही,’ असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. या पाण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम आणि संघर्ष केला आहे, त्यामुळे पाणी आल्यावर आता जलपूजनाचे बारसं कुणीही घातलं तरी पोरगं आमचंच असल्याचे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.म्हसवड येथे रथगृहाशेजारील बंधाºयात उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला भगवानराव गोरे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय धट, डॉ. वसंत मासाळ, सोमनाथ भोसले, दादा काळे, अकील काझी, संजय जगताप, लुनेश वीरकर, बाळासाहेब पिसे, शशिकांत गायकवाड, म्हसवडचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘उरमोडीच्या पाण्यासाठी मी रात्रंदिवस परिश्रम केले आहेत. फलटणकर नसते तर २० वर्षांपूर्वीच हे पाणी माणमध्ये आले असते. सध्याचे मुख्यमंत्रीही उरमोडीचा विषय निघाला की जयकुमारचे नाव घेतात. आताही हे पाणी एक महिना सलग सुरू राहणार आहे. पाणी पुढे न्यायचा विषय समोर येत आहे; मात्र आमची तहान भागल्याशिवाय एकही थेंब पुढे जाणार नाही.उरमोडीचे पाणी हवे असेल तर आमच्या सोळा गावांना टेंभूचे पाणी द्यावे लागेल. भाजपच्या मंत्र्यांनी तसा निर्णय घेतल्याचे समजत आहे. महाबळेश्वरवाडीच्या तलावातून पुढे १६ गावांना ते पाणी कसे जाणार, याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे,’ असेही त्यांनी सांगितले.माता-भगिंनीच्या डोळ्यात आनंदाश्रूपावसाने ओढ दिल्याने पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हसवड परिसरातील शेतकरी महिलांनी आ. गोरेंकडे उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याच पाण्याने भरलेल्या बंधाºयात जलपूजन करताना जमलेल्या माताभगिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे पाणी आमच्या जगण्याची आशा आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.