शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बारसे कोणीही घातलं तरी पोरगं आमचंच:जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:06 IST

म्हसवड : ‘उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माझ्या माण आणि खटाव तालुक्यांच्या हक्काचं आहे. इथल्या मातीची आणि जनतेची तहान भागल्याशिवाय या पाण्याचा एक थेंबही देवापूरच्या पुढे जाऊ देणार नाही,’ असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. या पाण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम आणि संघर्ष केला आहे, त्यामुळे पाणी ...

म्हसवड : ‘उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माझ्या माण आणि खटाव तालुक्यांच्या हक्काचं आहे. इथल्या मातीची आणि जनतेची तहान भागल्याशिवाय या पाण्याचा एक थेंबही देवापूरच्या पुढे जाऊ देणार नाही,’ असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. या पाण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम आणि संघर्ष केला आहे, त्यामुळे पाणी आल्यावर आता जलपूजनाचे बारसं कुणीही घातलं तरी पोरगं आमचंच असल्याचे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.म्हसवड येथे रथगृहाशेजारील बंधाºयात उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला भगवानराव गोरे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय धट, डॉ. वसंत मासाळ, सोमनाथ भोसले, दादा काळे, अकील काझी, संजय जगताप, लुनेश वीरकर, बाळासाहेब पिसे, शशिकांत गायकवाड, म्हसवडचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘उरमोडीच्या पाण्यासाठी मी रात्रंदिवस परिश्रम केले आहेत. फलटणकर नसते तर २० वर्षांपूर्वीच हे पाणी माणमध्ये आले असते. सध्याचे मुख्यमंत्रीही उरमोडीचा विषय निघाला की जयकुमारचे नाव घेतात. आताही हे पाणी एक महिना सलग सुरू राहणार आहे. पाणी पुढे न्यायचा विषय समोर येत आहे; मात्र आमची तहान भागल्याशिवाय एकही थेंब पुढे जाणार नाही.उरमोडीचे पाणी हवे असेल तर आमच्या सोळा गावांना टेंभूचे पाणी द्यावे लागेल. भाजपच्या मंत्र्यांनी तसा निर्णय घेतल्याचे समजत आहे. महाबळेश्वरवाडीच्या तलावातून पुढे १६ गावांना ते पाणी कसे जाणार, याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे,’ असेही त्यांनी सांगितले.माता-भगिंनीच्या डोळ्यात आनंदाश्रूपावसाने ओढ दिल्याने पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हसवड परिसरातील शेतकरी महिलांनी आ. गोरेंकडे उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याच पाण्याने भरलेल्या बंधाºयात जलपूजन करताना जमलेल्या माताभगिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे पाणी आमच्या जगण्याची आशा आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.