शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बारसे कोणीही घातलं तरी पोरगं आमचंच:जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:06 IST

म्हसवड : ‘उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माझ्या माण आणि खटाव तालुक्यांच्या हक्काचं आहे. इथल्या मातीची आणि जनतेची तहान भागल्याशिवाय या पाण्याचा एक थेंबही देवापूरच्या पुढे जाऊ देणार नाही,’ असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. या पाण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम आणि संघर्ष केला आहे, त्यामुळे पाणी ...

म्हसवड : ‘उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माझ्या माण आणि खटाव तालुक्यांच्या हक्काचं आहे. इथल्या मातीची आणि जनतेची तहान भागल्याशिवाय या पाण्याचा एक थेंबही देवापूरच्या पुढे जाऊ देणार नाही,’ असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. या पाण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम आणि संघर्ष केला आहे, त्यामुळे पाणी आल्यावर आता जलपूजनाचे बारसं कुणीही घातलं तरी पोरगं आमचंच असल्याचे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.म्हसवड येथे रथगृहाशेजारील बंधाºयात उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला भगवानराव गोरे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय धट, डॉ. वसंत मासाळ, सोमनाथ भोसले, दादा काळे, अकील काझी, संजय जगताप, लुनेश वीरकर, बाळासाहेब पिसे, शशिकांत गायकवाड, म्हसवडचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘उरमोडीच्या पाण्यासाठी मी रात्रंदिवस परिश्रम केले आहेत. फलटणकर नसते तर २० वर्षांपूर्वीच हे पाणी माणमध्ये आले असते. सध्याचे मुख्यमंत्रीही उरमोडीचा विषय निघाला की जयकुमारचे नाव घेतात. आताही हे पाणी एक महिना सलग सुरू राहणार आहे. पाणी पुढे न्यायचा विषय समोर येत आहे; मात्र आमची तहान भागल्याशिवाय एकही थेंब पुढे जाणार नाही.उरमोडीचे पाणी हवे असेल तर आमच्या सोळा गावांना टेंभूचे पाणी द्यावे लागेल. भाजपच्या मंत्र्यांनी तसा निर्णय घेतल्याचे समजत आहे. महाबळेश्वरवाडीच्या तलावातून पुढे १६ गावांना ते पाणी कसे जाणार, याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे,’ असेही त्यांनी सांगितले.माता-भगिंनीच्या डोळ्यात आनंदाश्रूपावसाने ओढ दिल्याने पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हसवड परिसरातील शेतकरी महिलांनी आ. गोरेंकडे उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याच पाण्याने भरलेल्या बंधाºयात जलपूजन करताना जमलेल्या माताभगिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे पाणी आमच्या जगण्याची आशा आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.