शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या गावी घरांना गवताच्या झडपा, घरांच्या भिंतीच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना; कास परिसरात लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:30 IST

कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. मुसळधार पावसात घराबाहेर पडणे अवघड असते. शेतीकामासाठी बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगडयाची तुडूस याचा सर्रास वापर होतो.

सागर चव्हाणपेट्री : कास परिसरातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील गावांगावात पारंपरिक पध्दतीने घरांच्या भिंतीचे संरक्षण होण्यासाठी कोळंबांच्या गवताची झडपी बांधण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बहुतांशी गावांतील आवश्यक घरांना झडपी बांधल्या आहेत. पावसाळ्यात जोरदार पाऊस, दाट धूके, जास्त थंडी पाहता घरातील वातावरण उबदार राहण्यासाठी जुन्या, पारंपरिक पध्दतीने कोळंब गवताच्या झडपी बांधून पर्यावरणपुरक उपाययोजना केली जात आहे.

कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. मुसळधार पावसात घराबाहेर पडणे अवघड असते. शेतीकामासाठी बाहेर पडताना पावसाच्या बचावासाठी इरली, टापूस, घोंगडयाची तुडूस याचा सर्रास वापर होतो. मुसळधार पावसासह वाऱ्याचा जोर जास्त असल्याने छत्री, रेनकोटचा वापर अल्प आहे. मनुष्य आपलं संरक्षण करतो तसंच गवताच्या झडपी बांधून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करतो. घरांच्या भिंतीना पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी जुन्या, पारंपरिक पध्दतीने कोळंब गवताच्या झडपी बांधतात. बहुतांशीजणांनी झडप्या बांधून घरांच्या भिंतीला संरक्षणात्मक उपाय केला असून काही ठिकाणी झडप्या बांधण्याचे काम वेगात सुरू आहे.

मुसळधार पावसाच्या पाण्याचा तडाखा ज्या दिशेने बसतो अशा बाजूच्या घरांच्या भिंतींना कोळंब गवताची झडपी बांधतात. साधारण जूनच्या सुरूवातीस कामाला सुरूवात होते. भिंतीपासून काही अंतरावर दोन्ही बाजूला लाकडं उभी करून मेसाची फोकाटी आडवी-उभी, आत-बाहेर वेलीने बांधून मध्यभागी कोळंब गवतात विशिष्ट पध्दतीने झडपी बांधतात. पूर्वी छपरासाठी कौले न वापरता गवताची झडपी छप्पर म्हणून वापरायचे. सध्या बऱ्याच ठिकाणी कौलांचे छप्पर असून केवळ घरांच्या भिंतीचे पावसाच्या तडाख्यापासून संरक्षण होण्यासाठी गवताची झडपी बांधली जातात. पावसाळयानंतर कुजलेले गवत तरव्याला खत म्हणुन वापरतात.दुर्गम, डोंगरमाथ्यावर पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसतो. भिंतीवर पडलेले पाणी जमिनीपर्यंत आणण्याचे काम झडपीमुळे होते. घराच्या भिंती पावसाच्या तडाख्याने भिजून घरामध्ये ओल येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. भिंती भिजून ओल निर्माण होऊ नये, थंडीपासून संरक्षण होण्यासाठी शेतकरी कोळंब गवताची झडपी आवश्यकतेनुसार आपापल्या घरांच्या भिंतींना बांधतात. झडपी बांधण्यासाठी शेतकरी कोळंब गवत राखून ठेवतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस