जिल्ह्यात सर्वाधिक दर २,४३१ रुपयांचा
By Admin | Updated: December 2, 2015 00:40 IST2015-12-01T22:54:27+5:302015-12-02T00:40:40+5:30
एफआरपीची घोषणा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या सभासदांचे भवितव्य स्पष्ट; ‘ग्रीन पॉवर’ची एफआरपी नीचांकी

जिल्ह्यात सर्वाधिक दर २,४३१ रुपयांचा
संजय कदम -- वाठार स्टेशन-गेल्या वर्षापासून पहिल्यांदाच राज्यात केंद्राच्या एफआरपीनुसार उसाचा दर, अशी भूमिका शासनाने घेतल्याने मागील गाळप हंगामातील शासनाने जाहीर केलेली एफआरपी अद्याप काही कारखान्यांनी दिली नसताना आता नव्याने चालू हंगामाची एफआरपी जाहीर करण्यात आली आहे. मागील गाळप हंगामातील कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यावरून चालू हंगामातील तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता या हंगामात सर्वाधिक एफआरपी जरंडेश्वरची २,४३१ रुपयेतर सर्वात कमी एफआरपी २,०६८ रुपये ग्रीन पॉवर शुगर्सने जाहीर केली आहे.शासनाने जाहीर केलेली एफआरपी रक्कम एकरकमी देणे जरी कारखान्यांना बंधनकारक असले तरी सध्याच्या परिस्थितीत ती देणे शक्य नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेत शासनाने याबाबत कारखानदारांना योग्य ती मदत करण्याची गरज व्यक्त केली आहे. तर शासन प्रवाहात घटक पक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र तलवार म्यान करूनच सत्ता सहभागात लालदिव्याच्या मोहापोटी गप्प राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारच्याच भरोशावर बसण्याची वेळ आली आहे.
एफआरपीबाबत कारखानदारांच्या भूमिका विचारात घेणेही गरजेच्या आहेत. यामध्ये शासन केवळ उसाच्या दराबाबत आग्रही भूमिका घेत आहे. मात्र साखरेच्या दराबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. जो पर्यंत साखरेच्या दराबाबत हमीभाव निश्चित होत नाही, तो पर्यंत तरी एफआरपी देण्याबाबत कारखानदार अडचणीत सापडणार आहेत. बाजारपेठेत साखरेची अस्थिरता, बँकाची मिळणारी उचल यातील तफावत लक्षात घेता शासनाच्या एफआरपी धोरणात बदल होणे गरजेचे आहे.
चालू हंगामासाठी जाहीर केलेली एफआरपी रक्कम ऊस गाळपानंतर १४ दिवसांत ऊसतोड केलेल्या शेतकऱ्याला देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित कारखान्याची उत्पादित साखर जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्याची रक्कम वसूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. अशी वेळ अद्याप तरी कोणत्याही कारखान्यावर आजपर्यंत आली नाही. मात्र, जाहीर एफआरपी शेतकऱ्यांना एकरकमी कशा पद्धतीने देणे शक्य आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
६ लाख ६१ हजार क्विंटल साखरेची निर्मिती
आज अखेर जिल्ह्यातील एकूण १२ कारखान्यांनी आपल्या गाळपाचा शुभारंभ करीत ६ लाख ६८ हजार २३४ टन उसाचे गाळप केले आहे. तर ६ लाख ६१ हजार ८१० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. या हंगामात रयत कारखान्याने अद्याप गाळपाचा शुभारंभ केलेला नाही.
नव्याने जाहीर केलेली कारखानानिहाय एफआरपी :