शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी- दोन टॉवरची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:27 IST

जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या

ठळक मुद्दे संपर्कात अडचणी येऊ नये म्हणून सतर्कता

सातारा : जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, हे ओळखून निवडणूक विभागाने दुर्गम भागात हायटेक तयारी केली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा पश्चिम भाग अत्यंत दुर्गम आहे. जंगलव्याप्त असणाºया या परिसरात मोबाईलला रेंज मिळत नाही. सुगम भागाशी संपर्कही साधणे कठीण असते. लोकसभा निवडणुकीचे मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, प्रशासनात सुसुत्रता कायम राहावी, या उद्देशाने प्रशासनाने पावले उचलली आहेत.

जावळी तालुक्यातील देवळीमुरा, उत्तरेश्वर या गावांमध्ये बीएसएनलच्या माध्यमातून मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. या भागात ड्युटी लागलेल्या कर्मचाºयांना बीएसएनएलचे सीम कार्ड घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ५५ गावांमध्ये वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील १८, महाबळेश्वर तालुक्यातील २७ व जावळी तालुक्यातील १0 गावांमध्ये वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांच्यासाठी वॉकी टॉकी देण्यात येणार आहे. 

ही सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असली तरीसुध्दा अधिकची दक्षता म्हणून वाहनधारी रनर्सची नेमणूकही करण्यात येणार आहे. ऐनवेळी सर्व यंत्रणा कोलमडली तरी दुचाकीवरुन सर्व निरोप जवळचे पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालयाला पोहोचवता येणार आहेत. मोबाईल टॉवरचे टेस्टिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर खºया अर्थाने ही सर्व यंत्रणा किती उपयोगाची आहे, याबाबत अंदाज बांधणे सोपे जाणार आहे. 

मतदानादिवशी दुर्गम भागात अडचणी टाळण्यासाठी निवडणूक विभागाने ही सतर्कता बाळगली आहे. दुर्गम भागात कार्यरत असणाºया निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांना वॉकी टॉकीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.- रेखा सोळंकी, नोडल आॅफीसर निवडणूक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरonlineऑनलाइन