शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘हॅलोऽऽ मी आंध्रप्रदेशात चित्तूरला पोहोचले!’ लेकरासह बेपत्ता पत्नीचा फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:07 IST

पाच महिन्यांच्या लेकरासह पत्नी गायब झालेली... ते रेल्वेतून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेलं... त्या आधारेच कुटुंबीयांनी अनेक रेल्वेस्थानकंपालथी घातली... अन् सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीच्या मोबाईलची रिंग वाचली.

ठळक मुद्दे दाहीदिशा एक करून शोध घेणाऱ्या पतीला झालं आभाळ ठेंगणं

सातारा : पाच महिन्यांच्या लेकरासह पत्नी गायब झालेली... ते रेल्वेतून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेलं... त्या आधारेच कुटुंबीयांनी अनेक रेल्वेस्थानकंपालथी घातली... अन् सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पतीच्या मोबाईलची रिंग वाचली. ‘हॅलोऽऽऽ मी बोलतेय, आम्ही आंध्रप्रदेशातल्या चित्तूरला पोहोचलेय, आम्हाला न्यायला या!’ हे शब्द कानावर पडले अन् पतीसाठी आभाळच ठेंगणं झालं. त्याच अवस्थेत त्यांनी आंध्रप्रदेशाकडं धाव घेतली.साताºयातील सदरबझार येथील राहत्या घरातून युगंधरा रत्नदीप पवार (वय २६) या मंगळवार, दि. १७ रोजी पहाटे पाचच्या सुमारास पाच महिन्यांच्या रणवीर मुलासह गायब झाल्या. हे लक्षात आल्यावर कुुटुंबीयांनी दुपारपर्यंत परिसरात शोध घेतला. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस त्यांच्या पद्धतीने शोध घेत होते.केवळ पोलिसांच्या तपासावर अवलंबून न राहता पती रत्नदीप यांनी त्यांच्या पद्धतीने शोध सुरूच ठेवला. सर्वप्रथम नातेवाईक, मित्रमंडळींना फोन करून ते आले आहेत का? याची विचारणा केली. सकारात्मक माहिती न मिळाल्यानंतर त्यांनी घर परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. एक-एक करत त्यांना हे दोघेही सातारा रेल्वे स्टेशनकडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रेल्वे व्यवस्थापनाला त्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची विनंती केली. प्रशासनानेही मदत केली असता हे माय-लेकरं मुंबई-अजमेर रेल्वेत बसले असल्याचे लक्षात आले.दोघांच्याही तपासासाठी रेल्वे हाच एकमेव धागा उरला होता. रत्नदीप, भाऊ मनिष यांनी कोल्हापूरच्या बाजूचे सर्व रेल्वेस्थानके पालथी घातली; पण तपास लागत नव्हता.त्याबरोबरच दोघांचेही फोटो सोशल मीडियावर टाकून शोध सुरू केला. युगंधराचे महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झालेले. तेथे जाऊन त्यांच्या बॅचमेटच्या सर्व मुला-मुलींची नावे, मोबाईल नंबर शोधून काढली. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी या दोघांना पाहिले आहे का? याची विचारणा करत होते; पण हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळे निराश अवस्थेत ते सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयात आले. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर युगंधरा यांचा फोन आला. ‘आम्ही आंध्रप्रदेशातील चित्तूरला आलो आहोत. आम्हाला न्यायला या,’ असे सांगितले.’ हे शब्द ऐकल्यानंतर काय करावे, हेच कळत नव्हतं. लागलीच चारचाकी वाहनाचा शोध घेऊन भावंडे चित्तूरकडे रवाना झाले.मिरज रेल्वेस्थानकातील फलाटावर बारा तासपवार भावंडे जिल्ह्यातील एक-एक रेल्वे स्टेशनमध्ये शोध घेत मिरजमध्ये पोहोचले. तेथेही रेल्वे प्रशासनाला विनंती करून त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याची विनंती केली. प्रशासनाने यांची भावनिक अवस्था लक्षात घेऊन सीसीटीव्ही फुटेज दाखविले. त्यातील दृश्य पाहून सर्वांना हादराच बसला. युगंधरा अन् पाच महिन्यांचे रणवीर हे दोघेही तब्बल बारा तास फलाटावरच होते. अधूनमधून या फलाटावरून दुसºया फलाटावर जात होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वेPoliceपोलिस