शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विजेच्या लंपडावाने शेतकरी मेटाकुटीला, भारनियमनाचा परिणाम; शेतीची कामे खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:08 IST

चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही.

कोपर्डे हवेली : सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने ऊष्णतेच वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे पिकांना जादा पाणी लागत आहे. त्यातच वीजेचे भारनियमन वाढले आहे. वीज येणा-जाण्यात सातत्य नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीकडे वीजेचे वेळापत्रक नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.दिवस आणि रात्री विभागानुसार वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाला आठ तास वीज दिली जाते. चार दिवसांपासून विजेचे भारनियमन वाढवण्यात आले. ते असतानाच वीज कधी येणार आणि कधी बंद होणार या विषयी विजवितरण कंपनीकडे नियोजन नाही.काहीवेळा विभानुसार व्हाट्सअप मेजेस विज वितरण कंपनीकडून पाठवले जातात. त्यामध्ये वीज येणार नाही असे सांगितले जाते. पण येणार कधी हे सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांना वाट पाहत बसावे लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकांना जादा पाणी लागत आहे. पाणी असूनही देता येत नाही अशी अवस्था विजेआभावी होत आहे.शेतकरी विजेची वाट पाहत बसत असल्याने दुसऱ्या कामांचा खोळांबा होत आहे. बीले भरुन आम्हाला वेळेत वीज मिळत नाही, आशी शेतकऱ्यांची भावना आहे. भारनियमनात विजेचे वेळापत्रक ठरवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरelectricityवीजFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण