शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी,  रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 21:17 IST

कोयना धरण दरवाजे १३ फुटांवर : ९५ हजार क्यूसेक विसर्ग; पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत

 नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे सहा तालुक्यांतील शाळांना आणि जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. तर अनेक तालुक्यांतील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. लोकांचे स्थलांतर सुरू आहे. तसेच कोयना धरणाचा साठा १०० टीएमसी पार गेल्याने रात्री दरवाजे १३ फुट उचलून ९३ हजार तर पायथा वीजगृहासह एकूण ९५ हजार ३०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे.

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पश्चिम भागातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्यात एकसारखा पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. तसेच प्रमुख सहा धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे विसर्गातही वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा १००.३९ टीएमसी झाला होता. त्यातच धरणात ९१ हजार २७१ क्यूसेक आवक होती. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रात्री आठ वाजता धरणाचे दरवाजे १३ फुटांपर्यंत वर उचलून ९३ हजार २०० क्यूसेक तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ९५ हजार ३०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

पाटण तालुक्यात हेळवाकजवळ पूल पाण्याखाली गेल्याने कऱ्हाड-चिपळूण या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच कोयना नदीवरील नेरळे, मुळगाव पुलासह निसरे आणि तांबवे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे इतर मार्गावरील वाहतूकही ठप्प होती. पाटण तालुक्यातीलच हेळवाक गावात नदीचे पाणी शिरल्याने ५ कुटुंबातील १० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. रासाटी येथे रस्त्यावर झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प होती. सातारा तालुक्यात वेण्णा नदीला पूर आल्याने हामदाबाज- किडगाव आणि करंजे-म्हसवे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. खंडाळा तालुक्यातही काही पुलावरुन पाणी जाऊ लागल्याने वाहतूक थांबविण्यात आलेली आहे.

प्रमुख ६ धरणांतून १ लाख १९ हजार क्यूसेक विसर्ग; नद्यांना पूर

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख सहा प्रकल्पांत सुमारे १४३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९६ टक्के हे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे. या सहा धरणांतून १ लाख १९ हजार क्यूसेक पाणी सोडले जात होते. यामुळे वेण्णा, कोयना, कृष्णा, उरमोडी नद्यांना पूर आलेला आहे.

वाई, महाबळेश्वर, कऱ्हाडला स्थलांतर

महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी नदीकाठच्या येरणे बुद्रुक गावातील आठ कुटुंबातील १८ जणांना, वाई शहरातील ४० कुटुंबे, कऱ्हाड शहरात पत्राचाळ अन् पाटण काॅलनीतील २१ कुटुंबातील ८१ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

टॅग्स :Satara Floodसातारा पूरRainपाऊस