शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी,  रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 21:17 IST

कोयना धरण दरवाजे १३ फुटांवर : ९५ हजार क्यूसेक विसर्ग; पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत

 नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे सहा तालुक्यांतील शाळांना आणि जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. तर अनेक तालुक्यांतील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. लोकांचे स्थलांतर सुरू आहे. तसेच कोयना धरणाचा साठा १०० टीएमसी पार गेल्याने रात्री दरवाजे १३ फुट उचलून ९३ हजार तर पायथा वीजगृहासह एकूण ९५ हजार ३०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे.

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पश्चिम भागातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्यात एकसारखा पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. तसेच प्रमुख सहा धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे विसर्गातही वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा १००.३९ टीएमसी झाला होता. त्यातच धरणात ९१ हजार २७१ क्यूसेक आवक होती. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रात्री आठ वाजता धरणाचे दरवाजे १३ फुटांपर्यंत वर उचलून ९३ हजार २०० क्यूसेक तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ९५ हजार ३०० क्यूसेक विसर्ग सुरू झाला होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

पाटण तालुक्यात हेळवाकजवळ पूल पाण्याखाली गेल्याने कऱ्हाड-चिपळूण या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच कोयना नदीवरील नेरळे, मुळगाव पुलासह निसरे आणि तांबवे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे इतर मार्गावरील वाहतूकही ठप्प होती. पाटण तालुक्यातीलच हेळवाक गावात नदीचे पाणी शिरल्याने ५ कुटुंबातील १० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. रासाटी येथे रस्त्यावर झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प होती. सातारा तालुक्यात वेण्णा नदीला पूर आल्याने हामदाबाज- किडगाव आणि करंजे-म्हसवे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. खंडाळा तालुक्यातही काही पुलावरुन पाणी जाऊ लागल्याने वाहतूक थांबविण्यात आलेली आहे.

प्रमुख ६ धरणांतून १ लाख १९ हजार क्यूसेक विसर्ग; नद्यांना पूर

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख सहा प्रकल्पांत सुमारे १४३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९६ टक्के हे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे. या सहा धरणांतून १ लाख १९ हजार क्यूसेक पाणी सोडले जात होते. यामुळे वेण्णा, कोयना, कृष्णा, उरमोडी नद्यांना पूर आलेला आहे.

वाई, महाबळेश्वर, कऱ्हाडला स्थलांतर

महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी नदीकाठच्या येरणे बुद्रुक गावातील आठ कुटुंबातील १८ जणांना, वाई शहरातील ४० कुटुंबे, कऱ्हाड शहरात पत्राचाळ अन् पाटण काॅलनीतील २१ कुटुंबातील ८१ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

टॅग्स :Satara Floodसातारा पूरRainपाऊस