शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर, कोयना धरणातून ११ हजार ६४६ क्यूसेकने विसर्ग सुरू

By नितीन काळेल | Updated: September 27, 2024 19:27 IST

महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून २४ तासांत महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारासच दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून परतीचा पाऊस जोर धरु लागला आहे. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे ओढे भरुन वाहत आहेत. तलवांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागला आहे. तरीही या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसू लागलाय. काढणीच्या वेळीच पाऊस होत असल्याने नुकसान पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातही पाऊस वाढला आहे. तर पश्चिमेकडेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या सहा प्रकल्पात एकूण १४८ टीएमसीवर पाणीसाठा होतो. हे सर्व धरणे भरली आहेत. यामुळे पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुरू करण्यात येत आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६५ तर नवजाला ८० आणि महाबळेश्वरमध्ये ११४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयनेत २३ हजार ७८७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर सकाळी धरणात १०५.२५ टीएमसी साठा झाल्याने १०० टक्के भरलेले आहे.

त्यातच गुरूवारी सायंकाळनंतर कोयनेत पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास कोयनेचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. सकाळच्या सुमारास धरणातून पायथा वीजगृह २ हजार १०० आणि दरवाजातून ९ हजार ५४६ असा एेकूण ११ हजार ६४६ क्यूसेक विसर्ग सुरू होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण