शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

अनोखा प्रयोग! साताऱ्यातील ओढ्यांवर साकारतेय ‘हॅँगिंग गार्डन’; कचरा डेपोतील प्लास्टिक बाटल्यांचा असाही वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:56 IST

शहराच्या सौंदर्यात भर

सातारा : शहर स्वच्छतेत राज्य व देशपातळीवर आपला नावलौकिक उंचावणारे सातारा शहर आता कात टाकू लागले आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या संकल्पनेतून शहरातील ओढ्यांचा कायापालट झाला असून, या ओढ्यांवरील जाळीवर शोभिवंत रोपांच्या कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कुंड्या शहराच्या सौंदर्यात भर घालू लागल्या आहेत.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ या अभियानात सातारा पालिकेने देशात अकरावा, तर राज्यात तिसरा क्रमांक पटकविला. दिल्ली येथील सोहळ्यात पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवदेखील करण्यात आला आहे. स्वच्छ व सुंदर शहराची ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शहरात नवनवे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ओढ्यांवर शोभिवंत रोपांच्या कुंड्या लावल्या जात आहेत.पालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर विसावा नाका येथील एका ओढ्यावर अशा प्रकारच्या कुंड्या लावल्या होत्या. या कुंड्या व त्यातील रोपांचे योग्य पद्धतीने संवर्धन झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील इतर ओढ्यांवर अशा कुंड्या लावण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार शहरात ठिकठिकाणी मिळून सुमारे दोन हजार कुंड्या लावण्यात आल्या असून, या अनोख्या प्रयोगामुळे ओढ्यांत कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय या कुंड्या शहराच्या वैभवातही भर घालू लागल्या आहेत.

कचरा डेपोतील प्लास्टिक बाटल्यांचा असाही वापर

  • सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत दररोज मोठ्या संख्येने प्लास्टिक बाटल्या संकलित केल्या जातात.
  • या बाटल्यांचा वृक्षलागवडीसाठी कल्पकतेने वापर करण्यात आला आहे.
  • एका बाटलीचे दोन काप करून प्रत्येक बाटलीत शोभिवंत झाड लावून ते ओढ्यांवरील जाळीवर लावण्यात आले आहे.

आतापर्यंत लागल्या २ हजार कुंड्यापालिकेने विसावा नाका, माची पेठ, कोटेश्वर मंदिर, हुतात्मा स्मारक या ठिकाणी मिळून तब्बल २ हजार कुंड्या लावल्या आहेत. शहरातील सर्वच ओढ्यांवर अशा प्रकारच्या कुंड्या लावून शहराचे सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

कुंड्यांमधील शोभिवंत फुलझाडेचिनी गुलाब, हॉपिस टाइम, रोहिओ, मनी प्लान्ट

नागरिकांनी पालकत्व स्वीकारावेशहर सुशोभीकरणासाठी पालिकेकडून नवनवीन प्रयोग राबविले जात आहे. पालिकेच्या या प्रयत्नांना नागरिकांनी देखील पाठबळ द्यायला हवे. शहरात ज्या-ज्या भागात अशा कुंड्या लावण्यात आल्या आहेत, त्या कुंड्यांत पाणी घालण्याचे काम पालिकेकडून जरूर केले जाईल. मात्र, नागरिकांनी देखील या रोपांचे पालकत्व स्वीकारून आपापल्या भागातील कुंड्यांना पाणी घालावे. - अभिजित बापट, मुख्याधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण