शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अनोखा प्रयोग! साताऱ्यातील ओढ्यांवर साकारतेय ‘हॅँगिंग गार्डन’; कचरा डेपोतील प्लास्टिक बाटल्यांचा असाही वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:56 IST

शहराच्या सौंदर्यात भर

सातारा : शहर स्वच्छतेत राज्य व देशपातळीवर आपला नावलौकिक उंचावणारे सातारा शहर आता कात टाकू लागले आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या संकल्पनेतून शहरातील ओढ्यांचा कायापालट झाला असून, या ओढ्यांवरील जाळीवर शोभिवंत रोपांच्या कुंड्या लावण्यात आल्या आहेत. या कुंड्या शहराच्या सौंदर्यात भर घालू लागल्या आहेत.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’ या अभियानात सातारा पालिकेने देशात अकरावा, तर राज्यात तिसरा क्रमांक पटकविला. दिल्ली येथील सोहळ्यात पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवदेखील करण्यात आला आहे. स्वच्छ व सुंदर शहराची ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शहरात नवनवे प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून शहरातील ओढ्यांवर शोभिवंत रोपांच्या कुंड्या लावल्या जात आहेत.पालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर विसावा नाका येथील एका ओढ्यावर अशा प्रकारच्या कुंड्या लावल्या होत्या. या कुंड्या व त्यातील रोपांचे योग्य पद्धतीने संवर्धन झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील इतर ओढ्यांवर अशा कुंड्या लावण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार शहरात ठिकठिकाणी मिळून सुमारे दोन हजार कुंड्या लावण्यात आल्या असून, या अनोख्या प्रयोगामुळे ओढ्यांत कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय या कुंड्या शहराच्या वैभवातही भर घालू लागल्या आहेत.

कचरा डेपोतील प्लास्टिक बाटल्यांचा असाही वापर

  • सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत दररोज मोठ्या संख्येने प्लास्टिक बाटल्या संकलित केल्या जातात.
  • या बाटल्यांचा वृक्षलागवडीसाठी कल्पकतेने वापर करण्यात आला आहे.
  • एका बाटलीचे दोन काप करून प्रत्येक बाटलीत शोभिवंत झाड लावून ते ओढ्यांवरील जाळीवर लावण्यात आले आहे.

आतापर्यंत लागल्या २ हजार कुंड्यापालिकेने विसावा नाका, माची पेठ, कोटेश्वर मंदिर, हुतात्मा स्मारक या ठिकाणी मिळून तब्बल २ हजार कुंड्या लावल्या आहेत. शहरातील सर्वच ओढ्यांवर अशा प्रकारच्या कुंड्या लावून शहराचे सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

कुंड्यांमधील शोभिवंत फुलझाडेचिनी गुलाब, हॉपिस टाइम, रोहिओ, मनी प्लान्ट

नागरिकांनी पालकत्व स्वीकारावेशहर सुशोभीकरणासाठी पालिकेकडून नवनवीन प्रयोग राबविले जात आहे. पालिकेच्या या प्रयत्नांना नागरिकांनी देखील पाठबळ द्यायला हवे. शहरात ज्या-ज्या भागात अशा कुंड्या लावण्यात आल्या आहेत, त्या कुंड्यांत पाणी घालण्याचे काम पालिकेकडून जरूर केले जाईल. मात्र, नागरिकांनी देखील या रोपांचे पालकत्व स्वीकारून आपापल्या भागातील कुंड्यांना पाणी घालावे. - अभिजित बापट, मुख्याधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण