शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतक ऱ्यांच्या हाती ज्वारीऐवजी बाटूक!

By admin | Updated: January 13, 2016 22:28 IST

रब्बी हंगामसुद्धा वाया : दुष्काळी भागातील स्थिती; चार वर्षांपासून निसर्गाची बळीराजावर अवकृपा

कातरखटाव : खटाव तालुक्यासह जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाईमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा यासारखी पिके पाण्याअभावी करपून चालली आहेत. पाणीटंचाईमुळे या भागात ज्वारीची पेर ५० टक्केच झाली होती. ज्वारीला शेवटपर्यंत पाणी पुरत नसल्यामुळे या भागातील श्ोतक ऱ्यांच्या हाती ‘ज्वारीऐवजी बाटूक’ पदरात घेण्याची वेळ आली आहे. गेल्या चार वर्षांपासून अशी परिस्थिती आहे. दुष्काळीपट्ट्यातील या शेतक ऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीचं पीक भरघोस पदरात घेण्यासाठी बँकाचे कर्ज काढूून, उसनवारी पैसे घेऊन प्रयत्न सुरू केले होते. मात्र पीक जोमात डोलत असताना शेवटच्या टप्प्यात ते वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासू लागली आहे. पिकांना पाणीच पुरत नाही. त्यातच डोळ्यांसमोर पीक करपू लागल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगाम वाया गेलाच आहे, आता रब्बीचा हंगामही त्याच मार्गाने जाण्याची चिन्हे बळीराजाला दिसू लागली आहेत. काही भाग वगळता बोअर, विहिरी, बंधारे, कोरडे पडले आहेत. ज्वारीला कमीत कमी चार पाणी द्यावी लागतात. या भागात तिसरंही पाणी ज्वारीला फिरलं नाही. त्यामुळे शेतऱ्यांच्या घरातज्वारीचं पीक येण्याऐवजी कडब्याच्या पेंड्यावर समाधान मानावे लागत आहे. अंतिम टप्प्यात गव्हाची पेर काही प्रमाणात झाली होती; पंरतु यंदा जमिनीत ओल नसतानाही या भागातील शेतक ऱ्यांनी ज्वारी, गहू, पेरणी केली; पण भीषण पाणीटंचाईमुळे पिकांची वाढच खुंटली आहे. जमिनीला भेगा पडायला लागल्याने ज्वारीच्या पिकाचीही वाढ थांबली आहे. परिणामी उत्पादनातही घट होणार आहे. येथील शेतकऱ्यांना आता बाटुकावर समाधान मानावे लागणार आहे. खरिपापाठोपाठ रबीचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) शेजारच्या शिवारात पाणी आलंय... कातरखटाव गाव उरमोडी व तारळी पाणलोट क्षेत्रात येत आहे. बोंबाळे बोगद्यापासून तारळी प्रकल्प चालू होत आहे. कातरखटाव हे कायम अवर्षणग्रस्त असून, दुष्काळी पट्ट्यात येत आहे. इथूून पुढे उन्हाळ्यात या गावासह परिसरात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे शेजारच्या शिवारात उरमोडीचं पाणी आलंय आमच्या शिवारात का नाही, यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी व लाभधारकांनी पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून एकमत दिसून येणं खरं गरजेचं आहे.