शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 5:20 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज विसर्ग करावा लागणार : पूर्व भागात पावसामुळे नुकसान

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तर सर्वत्र खरीप हंगामातील पेरण्यांनाही उरक आला. मात्र, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून पाऊस कमी झाला. जुलै महिन्यातही पाऊस कमीच राहिला. त्यामुळे धरणात वेगाने पाणीसाठा वाढला नाही. याच काळात पूर्व दुष्काळी भागात अधूनमधून चांगला पाऊस होत गेला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली.जुलै महिन्यांत पावसाने ओढ दिली असलीतरी आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतर दमदार पाऊस पडू लागला. यामुळे मोठ्या धरणामध्ये वेगाने पाणीसाठा वाढला. परिणामी धरणे भरू लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. तरीही मागीलवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.सध्या धरण क्षेत्रात पाऊस अत्यल्प होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे अवघा २ तर यावर्षी आतापर्यंत ४२४२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. १०५.२५ टीएमसी क्षमता असणारे धरण भरण्यासाठी अजनू अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद आहे. धरण भरल्यानंतर पाण्याची आवक पाहून पायथा विजगृह व दरवाजातून विसर्ग करावा लागणार आहे, असे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. नवजा येथे सकाळपर्यंत १८ आणि जूनपासून ४८८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वला सकाळपर्यंत ९ व यावर्षी आतापर्यंत ४८६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.बाजरी, सोयाबीन, बटाट्याचे नुकसान...पूर्व दुष्काळी भागात दमदार पाऊस पडत आहे. बुधवारी सायंकाळपासून मान, खटाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, घेवडा, बटाटा, सोयाबीन अशा पिकांना चांगलाच फटका बसलाय. यामुळे बळीराजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक काढणी वेळीच पाऊस येत असल्याने नुकसान अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर