शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
4
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
5
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
6
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
7
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
8
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
9
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
10
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
11
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
12
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
13
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
14
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
15
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
16
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
17
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
18
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
19
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
20
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:21 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज विसर्ग करावा लागणार : पूर्व भागात पावसामुळे नुकसान

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तर सर्वत्र खरीप हंगामातील पेरण्यांनाही उरक आला. मात्र, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून पाऊस कमी झाला. जुलै महिन्यातही पाऊस कमीच राहिला. त्यामुळे धरणात वेगाने पाणीसाठा वाढला नाही. याच काळात पूर्व दुष्काळी भागात अधूनमधून चांगला पाऊस होत गेला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली.जुलै महिन्यांत पावसाने ओढ दिली असलीतरी आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतर दमदार पाऊस पडू लागला. यामुळे मोठ्या धरणामध्ये वेगाने पाणीसाठा वाढला. परिणामी धरणे भरू लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. तरीही मागीलवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.सध्या धरण क्षेत्रात पाऊस अत्यल्प होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे अवघा २ तर यावर्षी आतापर्यंत ४२४२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. १०५.२५ टीएमसी क्षमता असणारे धरण भरण्यासाठी अजनू अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद आहे. धरण भरल्यानंतर पाण्याची आवक पाहून पायथा विजगृह व दरवाजातून विसर्ग करावा लागणार आहे, असे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. नवजा येथे सकाळपर्यंत १८ आणि जूनपासून ४८८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वला सकाळपर्यंत ९ व यावर्षी आतापर्यंत ४८६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.बाजरी, सोयाबीन, बटाट्याचे नुकसान...पूर्व दुष्काळी भागात दमदार पाऊस पडत आहे. बुधवारी सायंकाळपासून मान, खटाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, घेवडा, बटाटा, सोयाबीन अशा पिकांना चांगलाच फटका बसलाय. यामुळे बळीराजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक काढणी वेळीच पाऊस येत असल्याने नुकसान अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर