शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 17:21 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज विसर्ग करावा लागणार : पूर्व भागात पावसामुळे नुकसान

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तर सर्वत्र खरीप हंगामातील पेरण्यांनाही उरक आला. मात्र, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून पाऊस कमी झाला. जुलै महिन्यातही पाऊस कमीच राहिला. त्यामुळे धरणात वेगाने पाणीसाठा वाढला नाही. याच काळात पूर्व दुष्काळी भागात अधूनमधून चांगला पाऊस होत गेला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली.जुलै महिन्यांत पावसाने ओढ दिली असलीतरी आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतर दमदार पाऊस पडू लागला. यामुळे मोठ्या धरणामध्ये वेगाने पाणीसाठा वाढला. परिणामी धरणे भरू लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. तरीही मागीलवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.सध्या धरण क्षेत्रात पाऊस अत्यल्प होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे अवघा २ तर यावर्षी आतापर्यंत ४२४२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. १०५.२५ टीएमसी क्षमता असणारे धरण भरण्यासाठी अजनू अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद आहे. धरण भरल्यानंतर पाण्याची आवक पाहून पायथा विजगृह व दरवाजातून विसर्ग करावा लागणार आहे, असे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. नवजा येथे सकाळपर्यंत १८ आणि जूनपासून ४८८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वला सकाळपर्यंत ९ व यावर्षी आतापर्यंत ४८६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.बाजरी, सोयाबीन, बटाट्याचे नुकसान...पूर्व दुष्काळी भागात दमदार पाऊस पडत आहे. बुधवारी सायंकाळपासून मान, खटाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, घेवडा, बटाटा, सोयाबीन अशा पिकांना चांगलाच फटका बसलाय. यामुळे बळीराजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक काढणी वेळीच पाऊस येत असल्याने नुकसान अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर