शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

साताऱ्याच्या बाजारपेठेत पालेभाज्यांचे अर्धशतक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:52 IST

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा भाज्यांच्या दरांवर परिणाम परिणाम झाल्याने गृहिणींचे बजेट मात्र, कोलमडले आहे. मेथी, पालक, पोकळा, चाकवत, तांदळी या सर्वच भाज्या ३० रुपयाला एक तर पन्नास रुपये जोडी या दराने विक्री होत आहे. एकीकडे फळभाज्यांची आवक वाढली असली तरी पालेभाज्यांची आवक मात्र घटली आहे.

ठळक मुद्देपालेभाज्यांचे दर भलतेच कडाडले पावसामुळे नुकसान झाल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात घट बाजारपेठेत उत्पादन कमी, मागणी अधिक असे चित्र

सातारा ,दि. ३१: परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा भाज्यांच्या दरांवर परिणाम परिणाम झाल्याने गृहिणींचे बजेट मात्र, कोलमडले आहे. मेथी, पालक, पोकळा, चाकवत, तांदळी या सर्वच भाज्या ३० रुपयाला एक तर पन्नास रुपये जोडी या दराने विक्री होत आहे. एकीकडे फळभाज्यांची आवक वाढली असली तरी पालेभाज्यांची आवक मात्र घटली आहे.

भाजी मंडईत गेल्या महिन्यात सर्वच प्रकारच्या फळ व पालेभाज्यांचे दर स्थिर होते. मात्र, परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने याचा सर्वाधिक फटका पालेभाज्यांना बसला. बाजारपेठेत उत्पादन कमी व मागणी अधिक असे चित्र निर्माण झाले असून, पालेभाज्यांचे दरही भलतेच कडाडले आहेत.

वीस रुपये जोडी या दराने विकली जाणारी मेथी, पालक, पोकळा, चाकवत, तांदळी या भाज्या आता पन्नास रुपये जोडी या दराने मिळत आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे पालेभाज्यांऐवजी फळभाज्यांना मागणी वाढू लागली आहे.

या आठवड्यात पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून पावटा, मटार, कोबी, फ्लॉवर, शेवगा, भोपळा, बटाटा, वांगी, ढोबळी मिरची या भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :vegetableभाज्याRainपाऊस