शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

rain in satara: खटावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस, शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:49 IST

कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघालेल्या तसेच या लाटेने हैराण झालेल्या जनतेला शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला. मात्र पावसामुळे गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

खटाव : मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. ४० अंशांच्या वर पारा जात आहे. कडाक्याच्या उन्हामुळे होरपळून निघालेल्या तसेच या लाटेने हैराण झालेल्या जनतेला आज, शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला. मात्र पावसामुळे गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.खटावमध्ये कडाक्याचे ऊन असतानाच अचानक ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली, तर नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाळी थंड वातावरणामुळे नागरिकांना उष्णतेतून दिलासा मिळाला.सध्या शेतात उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. एकीकडे कांद्याचे दर उतरले आहेत. याची चिंता शेतकऱ्याला लागली असतानाच कांदा काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र पुरती तारांबळ उडाली आहे. वादळामुळे खटावमध्ये विद्युत पुरवठा बंद झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस