शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

उन्हाळ्यातही जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात दोन वर्षांपासून पडत असणारा समाधानकारक पाऊस आणि जलसंधारणाची कामे यामुळे पाणीपातळी टिकूून राहत आहे. याचाच परिणाम ...

सातारा : जिल्ह्यात दोन वर्षांपासून पडत असणारा समाधानकारक पाऊस आणि जलसंधारणाची कामे यामुळे पाणीपातळी टिकूून राहत आहे. याचाच परिणाम म्हणजे उन्हाळ्याही सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत वाढ दिसून आली. विशेष म्हणजे, माण व खटावसारख्या दुष्काळी तालुक्यात स्थिती अधिक चांगली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर या महिन्यात भूजल सर्वेक्षण करण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील १०६ विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या वर्षीही मार्च महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळी मोजण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात एकूण निरीक्षण विहिरींची संख्या १०६ आहे. यामध्ये सर्वाधिक विहिरी या खटाव तालुक्यात १७ तर माणमध्ये १६ आणि कऱ्हाडला १५ आहेत. त्याचबरोबर, फलटण तालुक्यात १२, सातारा व पाटण तालुका प्रत्येकी १०, कोरेगाव ९, वाई ८, खंडाळा तालुका ५, महाबळेश्वर ३ आणि जावळी तालुक्यात १ निरीक्षण विहीर आहे. येथील भूजल पातळीची वाढ पाहता मार्च महिन्यात जावळी तालुक्यात २.७० मीटरवर भूजल पातळी आढळून आली. कऱ्हाडला ३.९५ मीटर, खंडाळा ४ मीटर, खटावला ६.१६ तर कोरेगाव तालुक्यात ५.६७ मीटरवर भूजल पातळी होती, तसेच माणमध्ये ५.८०, महाबळेश्वर १३.४०, पाटण ४.२५, फलटण ५.८८, सातारा ४.३४ आणि वाई तालुक्यात ६.८९ मीटरवर दिसून आली.

मागील ५ वर्षांच्या तुलनेत जावळी तालुक्यात ०.३६ मीटरने भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले, तर कऱ्हाडला ०.९९, खंडाळा १.४६, कोरेगाव १.२२, महाबळेश्वर ०.९४, पाटण तालुक्यात ०.५५, फलटण १.०३, सातारा ०.६६ आणि वाई तालुक्यात ०.८९ मीटरची वाढ नोंदली. विशेष म्हणजे, माण आणि खटाव या तालुक्यात पातळी चांगलीच वाढली आहे. खटावला २.३५ तर माणमध्ये २.३६ मीटरची वाढ आहे. जिल्ह्यात ही सर्वाधिक भूजल पातळी वाढ आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षे चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर पावसाचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत राहिला याचा हा परिणाम आहे. त्याचबरोबर, माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात वॉटर कप व शासनाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पाणी अडून राहून मुरत आहे. याचा परिणाम म्हणजे दुष्काळी तालुक्यात सर्वात अधिक पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

चौकट :

९४ विहिरींत वाढ...

जिल्ह्यात १०६ निरीक्षण विहिरी आहेत. मार्चमध्ये सर्वेक्षण केल्यावर ९४ विहिरींमध्ये वाढ तर १२ ठिकाणी घट आढळून आली. गेल्या वर्षी १४ विहिरीत घट होती. यंदा चांगली स्थिती आहे. तर खंडाळा तालुक्यातील १, कोरेगाव २, पाटण ४, वाई १ आणि सातारा आणि फलटण या तालुक्यातील प्रत्येकी २ अशा या १२ विहिरी आहेत, तर इतर तालुक्यातील सर्व निरीक्षण विहिरींमध्ये वाढ दिसून आली आहे.

......................................................................