शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री 

By दीपक शिंदे | Updated: January 24, 2024 19:37 IST

जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे

सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाज मागास कसा आहे याबाबत मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या आपल्या गावी देवाच्या यात्रेनिमित्त आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाज आरक्षणासाह विविध प्रश्नांवर भाष्य केले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल. यासाठी परिपूर्ण माहिती हवी आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या लोकांना ही माहिती द्यावी. सुदैवाने क्युरिटिव्ह पिटीशनबाबतही सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्याला जो अधिकार दिला आहे. त्यानुसार आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारला मदत केली पाहिजे. ओबीसी समाजाप्रमाणे आपण मराठा समाजाला सुविधा देतोय. सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून काही सुविधा देत आहोत. ज्याठिकाणी मराठा समाजाच्या लोकांना राहण्याची अडचण आहे. त्याठिकाणी वसतिगृहे बांधण्याचे काम सुरू आहे. काहींच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अशा साडेचार हजार मुलांना नियुक्त्यादेखील दिल्या आहेत.अनेक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्यांचे रेकॉर्ड इतर राज्यांत होते. दुसऱ्या भाषेत होते. त्यासाठी उर्दू, फारशी भाषेतील आणि निजामकालीन रेकॉर्ड काढून दिले आहे. आतापर्यंत कधीही न झालेले काम सरकार करते आहे. सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारे सरकार आहे. त्यामुळे आंदोलनाची आवश्यकता नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

खिचडी आणि कफन चोरांना लोक निवडून देतील ?माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोनात खिचडी, मृतदेहांवरील कफन ज्यांनी चोरले, त्यांना काय म्हणायचे ?. घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात का ?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्घाटनाला बोलावले की त्यांना पोटदुखी सुरू होते. डबल इंजिनचे सरकार बुलेट ट्रेनच्या गतीने काम करत आहे. याचा त्यांना पोटसूळ आहे. आमचे सरकार कामाला महत्त्व देते. शिवडी-न्हावाशेवा मार्ग, समृद्धी महामार्ग केला. बंद पाडलेली मेट्रो सुरू केली. विकास हाच आमचा अजेंडा आहे. नुकताच डाओसमध्ये गेलो अन् करार केले, आता रोजगार निर्माण करणार आहे. अशावेळी लोक इतरांचा विचार कशासाठी करतील ? असा प्रहार केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील