शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावले कासव गतीने - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 01:06 IST

म्हसवड (ता. माण) येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. पवार दिवसभर माण दौऱ्यावर होते.

म्हसवड (जि.सातारा) : दुष्काळी परिस्थिती आल्यावर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते. परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच नाही. हे सरकार दुष्काळाशी लढा देण्यास कमी पडले असून, त्यांची पावले कासवगतीने पडत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.म्हसवड (ता. माण) येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. पवार दिवसभर माण दौऱ्यावर होते.पवार म्हणाले, आपण दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. लोकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये जनावरे आणि माणसांना पाणी नाही. रोजगार आणि रेशनवरही धान्य नाही. जनवारांना चारा मिळेना अशी स्थिती आहे. पुढील अडीच महिन्यांचा काळ जायचा कसा, पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहेच. राज्यात दुष्काळाचे संकट मोठे आहे. राज्यातील वेगवेगळ्या चांगल्या संस्था, कारखानदारांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावावा.पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीतपवार यांनी शेतकऱ्यांना, तुम्ही पीक विमा काढलाय का? तुमची पिके जळाली, नुकसान भरपाई मिळाली का? असा प्रश्न केला. त्यावर लोकांनी हात वर करून पीक विमा काढूनही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.खासदार निधीतून दीड कोटीमाण, खटाव तालुक्यांतील असंख्य गावे दुष्काळाचा सामना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी डिझेलसाठी खर्च म्हणून खासदार निधीतून दीड कोटी रुपये लवकरच देण्यात येईल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली. पवार यांनी माण तालुक्याच्या दौºयात शिंदी खुर्द येथे कामाची पाहणी केली.गावांसाठी तीस टँकरमाण, खटाव तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी रोहित पवार यांच्यातर्फे तीस टँकर पुरवण्यात येणार आहेत. हे टँकर पावसाळा सुरू होईपर्यंत मागणी होईल, त्या गावांना मोफत पाणी पुरवठा करतील, असे ते म्हणाले.चंद्रकांत पाटील यांना विचारला भावनिक प्रश्नमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २३ तारखेला बारामतीत अवश्य विजयोत्सव साजरा करावा. बारामतीचा आनंद घ्यायचा असेल तर तो त्यांनी अवश्य घ्यावा. तो प्रश्न नाही; पण येथे आज लोकांना पाणी नाही, जनावरांना चारा, पाणी नाही. माणुसकी म्हणून आपली काय जबाबदारी आहे का नाही? असा सवाल पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना केला.असा होता दौरा..पवार सकाळी बारामतीहून माण तालुक्यात आले. बिजवडी, शिंदी येथे त्यांनी भेट दिली. वावरहिरे ग्रामस्थांशी संवाद साधला. भालवडी चारा छावणीस भेट दिली. पानवणला पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळ