शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लहान मुले, गरोदर महिला, स्तनदा माता यांचे पोषण उत्तम प्रकारे व्हावे, भविष्यामध्ये आरोग्याच्या संदर्भाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : लहान मुले, गरोदर महिला, स्तनदा माता यांचे पोषण उत्तम प्रकारे व्हावे, भविष्यामध्ये आरोग्याच्या संदर्भाने त्यांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून बाल विकास विभागाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना लागू केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या योजनेमध्ये तेल मिळते तिथे साखर नाही आणि साखर दिली तर तेल दिले जात नाही, अशी परिस्थिती आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने या योजनेतील लाभार्थींना पोषण आहार मिळावा, यासाठी नियोजन केले जाते. प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या आहाराचे वितरण करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या लाटेमध्ये या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पोषण आहारातील सर्व वस्तू मिळणे अपेक्षित असताना अनेक वस्तू मिळत नाहीत. तसेच कर्मचारी गावांमध्ये फिरकत देखील नाहीत, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.

पूरक पोषण आहार योजनेचे एकूण लाभार्थी : २०१६१२

सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थी : ७६३६८

गरोदर महिला लाभार्थी : १३८६४

स्तनदा माता : १४०७७

फोडणी कशी द्यायची?

कोट..

पूरक पोषण आहारामध्ये तेल मिळत नसल्यामुळे कोरडी भाजी करायची वेळ आलेली आहे. तेल नसल्यामुळे भाजी चविष्ट होत नाही आणि मुलेही खात नसल्यामुळे त्यांचे पोषण होत नाही.

- सुरेखा बाबर

कोट...

शासनाच्या योजनेतून मिळत असलेले पूरक पोषण आहार प्रत्येकालाच मिळेल, अशी खात्री राहिली नाही. आमच्याकडे डोंगरी भागात तर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणी फिरकले देखील नाही.

- मनीषा सूर्यवंशी

कोट..

पोषण आहार द्यायला महिला कर्मचारी फिरकत देखील नाहीत. आताच्या लॉकडाऊमध्ये खरेतर सर्वच कुटुंबांना पोषण आहाराची गरज होती. दुर्गम भागात मात्र पुरते दुर्लक्ष झालेले दिसते.

- मच्छिंद्र साळुंखे

अधिकारी कोट

पूरक पोषण आहारामध्ये शासनातर्फे ज्या वस्तू मंजूर आहेत, त्या मिळतात. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कोविडच्या साथीत देखील आम्ही घरपोच हे साहित्य पोहोचवतो आहे. ट्रान्सपोर्टचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, तो आता सुटला आहे.

- मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालविकास

काय काय मिळते आहारात?

१ या आहारामध्ये गहू, तांदूळ, तेल, साखर, मीठ, तिखट, डाळी, कडधान्य या वस्तूंचा अंतर्भाव आहे. शासनाच्या वतीने यासाठी निधी दिला जातो.

२ हे साहित्य लाभार्थींपर्यंत पोहोचले तर मुलांचे कुपोषण राहणार नाही. तीन महिने ते सहा वर्षांपर्यंत मुलांना हा पोषक आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

३ गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना देखील या आहाराची नितांत आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये किराणा साहित्याची दुकाने बंद असल्याने या महिलांना पूरक पोषण मिळत नाही.