शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

उपासमार टळली कारण : माणसातले देव आले भुकेलेल्यांच्या मदतीला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:39 IST

देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनो विषाणूमुळे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊन केल्यापासून आपल्या देशातील गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. जिल्हाबंदी आदेश लागू झाल्यानंतर अडकलेल्या प्रत्येकालाच स्वत:च्या घराची ओढ लागली आहे.

ठळक मुद्देअन्नधान्य अन् जेवणाच्या पाकिटांचे वाटप

सातारा : कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा लोकांना मदत करण्यासाठी काही ह्यमाणसातले देवह्ण अशा उपेक्षित आणि गरजू लोकांसाठी पुढे सरसावले असून, ते लॉकडाऊन झाल्यापासून दररोज अन्नधान्य व जेवणाच्या पॅकेटचे वाटप करत आहेत.

देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनो विषाणूमुळे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊन केल्यापासून आपल्या देशातील गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. जिल्हाबंदी आदेश लागू झाल्यानंतर अडकलेल्या प्रत्येकालाच स्वत:च्या घराची ओढ लागली आहे. अनेकांनी मिळेल त्या वाहनाने आपले गाव आणि घर गाठण्यास सुरुवात केली. काही तर शेकडो मैल अंतर पायी चालून आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने अशा लोकांना त्याच ठिकाणी थांबवून त्यांच्यासाठी जेवणाची आणि निवासाची सोय केली.

मात्र, आजही हजारो लोक रस्त्यावर आणि आपल्या घरात आहेत; पण त्यांच्या हाताला बरेच दिवस काम नाही. होते नव्हते ते धान्य आणि पैसे खर्च झाल्यानंतर आता खाण्यासाठी काहीच नाही. अशा लोकांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामध्ये विशेषत: उपेक्षित, गरीब, आजारी व्यक्ती, वृद्ध, दिव्यांगांचा समावेश आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस