शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

उपासमार टळली कारण : माणसातले देव आले भुकेलेल्यांच्या मदतीला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:39 IST

देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनो विषाणूमुळे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊन केल्यापासून आपल्या देशातील गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. जिल्हाबंदी आदेश लागू झाल्यानंतर अडकलेल्या प्रत्येकालाच स्वत:च्या घराची ओढ लागली आहे.

ठळक मुद्देअन्नधान्य अन् जेवणाच्या पाकिटांचे वाटप

सातारा : कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा लोकांना मदत करण्यासाठी काही ह्यमाणसातले देवह्ण अशा उपेक्षित आणि गरजू लोकांसाठी पुढे सरसावले असून, ते लॉकडाऊन झाल्यापासून दररोज अन्नधान्य व जेवणाच्या पॅकेटचे वाटप करत आहेत.

देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनो विषाणूमुळे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊन केल्यापासून आपल्या देशातील गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. जिल्हाबंदी आदेश लागू झाल्यानंतर अडकलेल्या प्रत्येकालाच स्वत:च्या घराची ओढ लागली आहे. अनेकांनी मिळेल त्या वाहनाने आपले गाव आणि घर गाठण्यास सुरुवात केली. काही तर शेकडो मैल अंतर पायी चालून आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने अशा लोकांना त्याच ठिकाणी थांबवून त्यांच्यासाठी जेवणाची आणि निवासाची सोय केली.

मात्र, आजही हजारो लोक रस्त्यावर आणि आपल्या घरात आहेत; पण त्यांच्या हाताला बरेच दिवस काम नाही. होते नव्हते ते धान्य आणि पैसे खर्च झाल्यानंतर आता खाण्यासाठी काहीच नाही. अशा लोकांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामध्ये विशेषत: उपेक्षित, गरीब, आजारी व्यक्ती, वृद्ध, दिव्यांगांचा समावेश आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस