शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

टँकरने पाणी द्या; अन्यथा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST

मायणी : येथील अनेक भागांमध्ये ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार ...

मायणी : येथील अनेक भागांमध्ये ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा करावा, अन्यथा हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य अर्चना जाधव यांनी सरपंच, ग्रामसेवकांना दिले आहे.

अर्चना जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, इंदिरानगर, कचरेवाडी, नदाफ कॉलनी, वडूज रोड, मरडवाक कॉलनी, श्रीराम कॉलनी, यशवंतनगर, शिक्षक कॉलनी व चांदणी चौक परिसर आदी भागांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना येरळवाडी तालुका खटाव येथील मध्यम प्रकल्पावर असलेल्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत आहे. गेल्या मे महिन्यामध्ये या प्रादेशिक नळपाणीपुरवठाची विद्युत मोटार जळाल्यामुळे वीस ते बावीस दिवस या भागांतील पाणीपुरवठा बंद होता. त्या वेळी ग्रामस्थांनी सहाशे रुपयेप्रमाणे टँकर विकत घेतला होता.

सध्या मायणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. परिसरामध्ये चारी बाजूला पाणीसाठा निर्माण झाला आहे. येथील ब्रिटिशकालीन तलावही गेल्या दहा दिवसांपासून भरुन वाहत आहे. असे चहूबाजूला पाणी असतानाही ग्रामस्थ सध्या कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा येरळवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटर बिघडल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. विद्युत मोटर दुरुस्त होऊन पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत सदर भागातील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अन्यथा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही.

निवेदन सरपंच सचिन गुदगे देण्यात आले. या वेळी उपसरपंच आनंदा शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार, रणजित माने, गजानन माळी उपस्थित होते. निवेदनामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रणजित माने, विनोद पवार, गजानन माळी, पापालाल नदाफ, वैशाली पवार, मनीषा श्रीखंडे यांच्या सह्या आहेत.